पुणे

'आम्ही आता म्हतारे झालो, निदान पुढच्या पिढीला तरी रस्ता द्या'

रवींद्र पाटे

नारायणगाव : साहेब आम्ही १६५ शेतकरी मागील सत्तावीस वर्षे सर्व्हे बांधावरून रस्ता मिळावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. एका शेतकऱ्याच्या विरोधामूळे आमची एक पिढी बरबाद झाली. आमची चूक नसताना उलट आमच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. ही कुठली लोकशाही. आम्ही आता म्हतारे झालो. निदान पुढच्या पिढीला तरी रस्ता मिळावा, अशी आर्त विनवणी येथील तांबेमळा शिवारातील जेष्ठ शेतकरी व महिलांनी नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्याकडे केली आहे. तांबेमळा शिवारातील सर्व्हे बांधावरील रस्त्याच्या  वादातून सरपंच योगेश पाटे, निवृत्ती तांबे यांच्यासह चार जणांवर गुरुवारी (ता. १८) नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या मुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दुपारी नारायणगाव पोलीस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक ताटे यांची भेट घेतली.

या वेळी झालेल्या बैठकीत शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी या रस्त्याची व्यथा व कथा विषद केली. या वेळी सरपंच योगेश पाटे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, सुजित खैरे यांच्यासह तक्रारदार शेतकरी उपस्थित होते.

या बाबत शेतकरी वसंत तांबे, आनंद तांबे म्हणाले, येथील सर्व्हे नंबर २५,११३,२४,१९४ च्या बांधावरून असलेला पिढीजात रस्ता १९९३ साली एका शेतकऱ्याने बंद केला. माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या प्रयत्नामूळे सन २००८ साली हा रस्ता खुला करण्यात आला. त्या नंतर हा रस्ता नांगरून पुन्हा बंद करण्यात आला. तहसीलदार यांचे आदेशाने १८ जुलै २०१४ साली पोलीस बंदोबस्तात आठ फूटी रस्ता तयार करण्यात आला. त्या नंतर संबंधित शेतकऱ्याने हा रस्ता नांगरून त्या ठिकाणी ऊस लागवड करुन पुन्हा बंद केला. रस्त्यातील अतिक्रमण काढून शेतमालाची वाहतूक करण्यासाठी रस्ता खुला करावा अशी मागणी तहसीलदार, पोलीस स्टेशन यांच्याकडे करण्यात आली.

पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी सात वेळा पैसे भरले. मात्र पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. प्रशासन यंत्रणेकडून वारंवार चालढकल झाली. या बाबत महसूलमंत्री यांच्यासह अनेक मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर २९ जानेवारी २०२१ रोजी जुन्नरचे तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला पत्र देऊन सर्व्हे बांधाच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी चार फूट रुंद रस्ता तयार करण्यासाठी पोलीस सरंक्षण देण्यासंदर्भात पत्र दिले. मात्र पोलीस सरंक्षण मिळाले नाही.

रस्ता बंद असल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या विनंतीवरून सरपंच पाटे मध्यस्थी करण्यासाठी तांबे मळा येथे आले. या वेळी अमोल तांबे व त्यांची पत्नी शुभांगी जेसीबीला आडव्या झाल्या. दुर्घटना टाळण्यासाठी सरपंच पाटे व उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी बाचाबाची झाली. त्या नंतर शुभांगी तांबे यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती तांबे, सरपंच पाटे यांच्यासह पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र अतिक्रमण करून रस्ता बंद करुन १६५ शेतकऱ्यांची गैरसोय करणारावर कारवाई झाली नाही. साहेब हा कुठला न्याय असा प्रश्न या वेळी शेतकऱ्यांनी ताटे यांना विचारला.

आपण दिलेल्या निवेदनाची, रस्त्यासंदर्भातील तहसीलदार यांच्या आदेशाची व इतर कागदपत्रे आदींची पहाणी करून रस्ता खुला करण्यासाठी पोलीस बंदोबस्त दिला जाईल. दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी कृती कोणीही करू नये.-पृथ्वीराज ताटे, सहायक पोलिस निरीक्षक

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

Pune News : लग्नानंतर वर्षातच न्यायालयात जाणाऱ्याला दणका; न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT