khadakwasla
khadakwasla 
पुणे

इंदापुरात पाणीच पाणी, खडकवासल्याच्या आवर्तनाने शेतकरी सुखावला 

विनायक चांदगुडे

शेटफळगढे (पुणे) : इंदापूर तालुक्यात मागील तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सिंचनाला आली होती. अशातच सध्या खडकवासला प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सध्या इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी आवर्तन सुरू आहे. पिकांच्या सिंचनाच्या गरजेच्यावेळी आवर्तन आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला आहे. या प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठा क्षमता  29.15 टीएमसी आहे. त्यापैकी 4 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत 29 टीएमसी अर्थात 99.43 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने कालव्याद्वारे सध्या 1 हजार 79 क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्याच्या हद्दीत 444 क्यूसेकने मिळत आहे. तालुक्यात मागील तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके सिंचनाला आली होती. मात्र, कालव्याचे पाणी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या बाजरी आणि मका, कडवळ व उसाच्या पिकाला पाणी देण्यास प्राधान्य दिले आहे. 

यासंदर्भात खडकवासला प्रकल्पाचे इंदापूरचे उपविभागीय अभियंता परदेशी यांनी सांगितले की, खडकवासला कालव्यातून सध्या इंदापूर तालुक्यात आवर्तन सुरू आहे. याद्वारे तालुक्यातील कालव्याच्या लाभक्षेत्रात येणारे आठपैकी सहा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात आलेले आहेत. सध्या तरंगवाडी आणि भादलवाडी तलावात पाणी सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर वडापुरी तलावात पाणी सोडले जाणार आहे. तसेच, शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर कालव्याच्या वितरिकांनाही पाणी सोडले जाणार आहे. तालुक्यात हे आवर्तन आणखी सहा ते सात दिवस चालणार आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT