Voting
Voting esakal
पुणे

Pune: मतदानाला शंभर टक्के जा,भावनांना नाही तर मुद्द्यांना प्राधान्य द्या, सारासार विचार करूनच निर्णय घ्या;आता नाही तर मग कधी !

संभाजी पाटील @pambhajisakal

Pune- कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला जाताना मतदारांच्या मनात अनेक प्रश्न असतील.

या निवडणुकीच्या निमित्ताने जो काही प्रचार झाला त्यातून मतदाराला आपले मत कोणाला द्यायचे याचा निश्चितच अंदाज आला असेल. जरी नसेल तरी त्याला निर्णय मात्र घ्यावाच लागणार आहे. मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावणे हा त्याच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे.

त्यामुळे कोण आला तरी आम्हाला काय फरक पडतो, असे म्हणून आपणच आपल्याला हव्या असणाऱ्या किंवा परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी नाकारात आहोत, असा अर्थ होतो. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने व्यक्त होण्याची सर्वात मोठी संधी मतदानाच्या निमित्ताने मिळत आहे. ती घेतली नाही तर आपणच करंटे ठरु.

मतदानाला जाताना मात्र आपण अधिक डोळसपणे जायला हवे. कोणाची तरी हवा आहे, माझे कुटुंब पहिल्यापासून याच पक्षाला किंवा विचाराला मतदान करते, कोणी मला काही तरी प्रलोभन दाखवले, दबाव आणला किंवा एखादा उमेदवार माझ्या गल्लीतला आहे

म्हणून त्याला मतदान करण्यापेक्षा तुम्हाला नेमकं काय हवे आहे याचा आधी विचार करायला हवा. उमेदवार, त्याचे आतापर्यंतचे काम, त्याची योग्यता, काम करण्याची पद्धत, प्रश्न सोडविण्याची धमक, त्याच्या पक्षाची कामगिरी-भवितव्य, शहराच्या तसेच मतदारसंघाच्या प्रश्नांची जाण आणि प्रश्न सोडविण्यासाठीचा त्याचा रोडमॅप या सर्वच गोष्टी तपासायला हव्यात.

या निवडणुकीसाठी झालेल्या प्रचारात फारसे काही हाती लागले असे म्हणता येत नाही. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री यांनी प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघासाठी बराच वेळ दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रचारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेऊन पोटनिवडणुकीचे महत्त्व आणखी वाढवले. यानिमित्ताने मतदारसंघ आणि एकूणच नागरी प्रश्नांची चुणूक या सर्वांना पाहायला मिळाली. सर्वच पक्षांनी मूळ प्रश्नांना बगल देऊन संपूर्ण प्रचार टीकाटिप्पणी आणि राजकारणाभोवतीच फिरवला तरी येणारी महापालिका निवडणूक स्थानिक प्रश्नांभोवती,

कामांभोवतीच लढवावी लागणार याची जाणीव त्यांना नक्कीच झाली असेल. पुणेरी पाट्यांच्या मार्फत दिलेले टोमणे किंवा हिंदुत्व यापेक्षाही आम्हाला मतदार संघातील प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, हे मतदानाच्या निमित्ताने राजकारण्यांना सांगण्याची संधी आज दवडता कामा नये.

ही निवडणूक होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट असेल, त्यामुळेच अधिक दक्षतेने आणि सारासार विचार करून निर्णय घ्यावा लागेल.

कसबा मतदारसंघातच स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे हब आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी आंदोलने करावी लागतात. नव्या अभ्यासक्रमाच्या मुदतवाढीसाठी आंदोलनाचा योग्य मुहूर्त विद्यार्थ्यांनी निवडला. त्याची दखल सर्व पक्षांना घ्यावी लागली.

त्यांचे प्रश्न राज्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यायला हवेत, हा संदेश यानिमित्ताने गेला, ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

योग्य प्रश्नांची जाणीव, त्यांची मांडणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाहीतील सर्वात मोठे शस्त्र असणारे मतदान या तिन्ही गोष्टी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जुळून आल्या आहेत. त्यामुळेच योग्य निर्णय घेणे फक्त आपल्याच हातात आहे. चाणाक्ष पुणेकरांना अधिक काही सांगण्याची गरज नसतेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT