download (1).jpg
download (1).jpg 
पुणे

महाराष्ट्रच सरकार हे केंद्र सरकारच चालवत आहे : राज ठाकरे

सकाळवृत्तसेवा

पुणे : "दोघेही सत्तेत आणि एकमेकांच्या विरोधात भांडत आहेत. याला काय सत्ताधारी म्हणतात का,' असा सवाल करून " महाराष्ट्रच सरकार हे केंद्र सरकारच चालवत आहे. वरून जे आदेश येतील, तेवढेच काम मुख्यमंत्री करीत आहेत. हे सरकार सांगकामे आहे,' अशी जहाल टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना सरकारवर केली. 

मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाण्यासाठी ठाकरे आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य आणि केंद्रातील सरकारवर ठाकरी शैलीत टीका केली. नीट परीक्षेपासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा, राममंदिर, रस्त्यावरील खड्डे, शेतकऱ्यांचे दूध आंदोलन अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांच्या नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
 
गेल्या चार वर्षात कोणतीही विकास कामे झाली नाहीत. आता निवडणुका जवळ आल्या. त्यामुळे त्यांना राममंदिर, भगवद्‌गीता वाटणे असले विषय सुरू झाले आहेत. चार वर्ष झोपले होते का. राममंदिर झाले पाहिजे. परंतु तो निवडणुकीचा विषय होता कामा नये. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार होते. त्यामुळे त्यांना शक्‍य झाले नाही. आता बहुमताचे सरकार आहे. हा विषय मार्गी लागावयास हवा होता. परंतु नोटाबंदी करतात, योगा करतात, खडकावर आडवे तिडवे पडतात, यासाठी सत्ता तुमच्या हातात दिली आहे का, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लगाविला. 

ठाकरे पुढे म्हणाले,"" नाणार प्रकल्पाला पहिले मी विरोध केला. त्याला पाठिंबा मिळतो आहे, हे पाहून आता शिवसेना पुढे येत आहे. सरकार मधलाच एक पक्ष नाणार होणार नाही असे म्हणतो, तर दुसरा पक्ष होणार म्हणतो. त्यामुळे नेमके काय होणार हे लोकांना कळेनासे झाले आहे. ही सत्ता म्हणजे मजाक होऊ बसली आहे.''  

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केल्यावर विधानसभेत गोंधळ सुरू आहे. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले," पुतळा बसविण्यास यापूर्वीच मी विरोध केला. त्यासाठी येणार खर्च महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरावा. ती महाराजांची खरी स्मारके आहेत. मी जे.जे स्कूल ऑफ आर्टसचा विद्यार्थी आहे. एवढा मोठा पुतळा कोण बनविणार, कसा बनविणार हे अद्याप स्पष्ट नाही. पुतळा बसविण्यासाठी सर्व परवानग्या अद्याप मिळालेल्या नाहीत. फक्त राजकारण सुरू आहे.'' 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT