कात्रज - सरहद महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलताना संजय नहार.
कात्रज - सरहद महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलताना संजय नहार. 
पुणे

संवादातून काश्‍मीरचे प्रश्‍न सुटतील - श्रीराम पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर सर्व मूलभूत समस्या संपणार नाहीत. काश्‍मीर हा देशाला पोखरणारा भाग आहे, हा विचार सोडून तेथील जनतेशी संवादाचे पूल बांधले तर या प्रश्‍नी उपाय सापडतील, असे मत ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्‍त केले.

सरहद महाविद्यालयातर्फे आयोजित ‘जम्मू-काश्‍मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर संधी आणि आव्हाने’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. पवार यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन झाले. श्रीनगरमधील ज्येष्ठ पत्रकार अहमद अली फय्याज, चित्रपट चळवळीतील कार्यकर्ते मुश्‍ताक अली अहमद खान, ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार, शैलेश वाडेकर, प्रशांत तळणीकर, संजय सोनावणी, उपप्राचार्या संगीता शिंदे आदी उपस्थित होते. पवार यांनी, कलम ३७० चा घटनेतील समावेश, रद्द केल्यानंतरच्या अडचणी, भविष्यात काश्‍मिरी जनतेवर होणारा परिणाम यावर भाष्य केले. कलम रद्दच्या निर्णयाचे भवितव्य सर्वोच्च न्यायालय ठरवेल, असे सांगितले.

फय्याज म्हणाले, ‘लोकोपयोगी धोरणांसाठी जनता, तरुणांना विचारात घेतले पाहिजे. शिक्षणाची चांगली व्यवस्था, पायाभूत सुविधांचा विकास, मनोरंजनाची साधनेही निर्माण करावीत. काश्‍मिरी पंडितांना दहशतवाद्यांमुळे बाहेर जावे लागले होते.’’

मुश्‍ताक अली म्हणाले, ‘पूर्वी वर्षभरात पन्नासहून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण व्हायचे. आता चार ते पाच चित्रपटांचे होते. इंटरनेट सेवा बंद केल्याने शैक्षणिक सुविधांवर परिणाम झाला. पर्यटन, हॉटेल आदी व्यवसायांमध्ये मंदी आली. पण, काश्‍मीरबाबत 
लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT