worker
worker 
पुणे

मध्य प्रदेशात निघालेले मजूर म्हणतायेत, "पैसे संपले, खायला अन्न नाही...' 

अविनाश पोफळे

पुणे : ""ज्या ठिकाणी आम्ही काम करीत होतो, तेथील ठेकेदाराने आमच्याकडे दुर्लक्ष केले. जेवण, अन्नधान्य काहीही दिले नाही. आता पैसेही संपले आहेत. हाताला काम पण नाही. त्यामुळे आता गावी गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आता आम्ही गावी निघालो आहे...'' अशी व्यथा खडकवासला परिसरात मजुरीचे काम करणाऱ्या, पण लॉकडाउनमुळे उपासमार होत असल्यामुळे पुन्हा आपल्या मध्य प्रदेशातील गावाकडे निघालेल्या एका मजुराने मांडली. 

धायरी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला या भागातील सुमारे 250 मजुरांना आज नांदेड सिटी गेटपासून बसद्वारे पुणे स्टेशन येथे नेण्यात आले. तेथून त्यांना रेल्वेद्वारे मध्य प्रदेश येथे पाठविण्यात येणार आहे. लॉकडाउननंतर ठेकेदाराने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. जेवण व अन्नधान्याची मदत न करता मजुरांना वाऱ्यावर सोडले. त्यातून त्यांची उपासमार सुरू झाली होती.

अशावेळी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी या मजुरांच्या मदतीला धावले. खडकवासला भागात अडकून पडलेल्या या परराज्यातील मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी ते दिवस- रात्र काम करीत आहेत. 

याबाबत खडकवासला येथील मंडल अधिकारी रोहिदास जाधव म्हणाले, ""सुमारे 300 मजुरांना मध्य प्रदेशात पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यांना येथून बसमधून पुणे स्टेशन येथे नेण्यात येईल. तेथून रेल्वेने मध्य प्रदेशात पाठविण्यात येईल. त्यांच्या जेवणाची पूर्ण काळजी घेतली आहे. शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.'' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या वेळी एका मजुराने व्यथा मांडली की, ""ठेकेदाराने आमच्याकडे दुर्लक्ष केले. जेवण, अन्नधान्य काहीही दिले नाही. मात्र, आता पैसे संपले आहेत. काम नाही. त्यामुळे गावी गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पोलिस, आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून चांगली मदत झाली.''  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT