Lonar_Lake 
पुणे

'या' घटकामुळे बदलला असावा लोणारचा रंग; ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग लाल होण्यामागे सूक्ष्मजीवांमार्फत सोडण्यात आलेले रंगद्रव्य असू शकते असा अंदाज लावण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात यासाठी पाण्याचे नमुने घेऊन अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय पेशीविज्ञान केंद्राचे (एनसीसीएस) ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांनी व्यक्त केले.

ज्योतिर्विद्या परिसंस्था या संस्थेच्या वतीने "लोणार सरोवरच्या पाण्यातील सुक्ष्मजीवांचे पैलू" या विषयावर आधारित सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माहिती देताना ते बोलत होते. जगातील विविध भागांमध्ये असलेल्या समुद्र, सरोवर, नदी सारख्या पाण्याच्या स्रोतांमध्ये होणारे बदल याला प्रामुख्याने सूक्ष्मजीव (मायक्रोब) आणि खनिज कारणीभूत असतात, असे सांगताना डॉ. शौचे म्हणाले, "लोणार सरोवर पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे पाणी खार आणि अल्कधर्मी (अल्कली युक्त) असून यात भरपूर क्षार आहे.

जगात अश्या बऱ्याच खऱ्या पाण्याच्या सरोवर आहेत. तर काही विशिष्ट काळानंतर यांच्या पाण्याचे रंग बदलते. 'ड्युनेलिला सॅलीना' शेवाळ आणि हॅलोबॅक्टेरिया वर्गातील जिवाणू प्रामुख्याने रंगद्रव्य सोडतात. पाण्यातील क्षारांचे प्रमाण किंवा तापमान वाढले तर या प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सुक्ष्मजीवाणू रंगद्रव्य तयार करतात. त्यामुळे पाण्याचे रंग लाल किंवा गुलाबी दिसतो."

बऱ्याच वेळेला सुक्ष्मजीवाणू अश्या प्रकारचे रंगद्रव्य पाण्यात तयार करतात परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने पाण्याच्या रंगात फारसा फरक दिसून येत नाही. मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जेव्हा रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार होतात तेव्हा पाण्याचा बदललेला रंग डोळ्याला सहजपणे दिसून येतो. एनसीसीएस मार्फत पूर्वी करण्यात आलेल्या लोणारच्या संशोधनातून पाण्यात हॅलोबॅक्टरीआ सूक्ष्मजीव असल्याचे निदर्शनास आले होते." 

"लोणारच्या पाण्याचा रंग बदलला असून याचा अभ्यास अजून पर्यंत झाला नाही. सुक्ष्मजीवांनी तयार केलेल्या रंगद्रव्याचा पाण्यावर काही हानिकारक परिणाम होत नाही. एनसीसीएस मार्फ़त या पाण्याचे नमुने मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नमुने मिळाल्यास आम्ही याचा अभ्यास करू. मात्र तेव्हाच या बाबतचे प्रश्न सुटतील."
- डॉ. योगेश शौचे, ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, एनसीसीएस

- पीककर्ज वाटपाबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना काय केल्या सूचना?

पाण्याचे रंग बदलल्यामागे असा लावला जात आहे अंदाज
- यंदा उन्हाचे प्रमाण वाढल्याने सरोवराचे पाणी आटले
- पाणी असल्यामुळे क्षारांचे प्रमाणात वाढ
- क्षरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने सुक्ष्मजीवांवर ताण निर्माण झाला व त्यामुळे रंगद्रव्य तयार झाले

पाण्यातील वातावरणात बदल दर्शविण्यासाठी सूक्ष्मजीव महत्वाचे
- पाण्यातील परिस्तिथीनुसार (तापमान, क्षार, अल्कधर्म, आम्लता) सूक्ष्मजीव वाढ करतात
- सुक्ष्मजीवांच्या प्रत्येक कार्यप्रणालीत होणारे बदल पाण्यात देखील बदल घडवून आणण्यास कारणीभूत असतात.
- त्यामुळे पाण्याचे वातावरण आणि स्वरूप बदललेले आहे याची पुष्टी करण्यात सूक्ष्मजीव महत्वाचे घटक ठरतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईतल्या अखेरच्या दोन वाॅर्डच्या मतमोजणीला सुरुवात

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

Devendra Fadnavis: मुंबईचा महापौर कोण होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिले संकेत; म्हणाले...

SCROLL FOR NEXT