MNS Chief Raj Thackeray speaks about Maharashtra Politics  
पुणे

राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल काही बोलायलाच नको : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रात जे काही घडले, तो म्हणजे मतदारांचा अपमान होता. भाजप व शिवसेनेने महाराष्ट्रातल्या मतदारांशी प्रतारणा केली. या नव्या सत्तासमीकरणांमुळे जनतेत नाराजी आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.  

विधानसभेच्या निकालात एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे, निवडणूकीपूर्वी ज्यांनी पक्षांतरे केली, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. भाजप-शिवसेनेला जनतेने बहुमत दिलं, पण त्यांनी जनतेशी प्रतारणा केली. काँग्रेस, राष्ट्रवादीबद्दल बोलायलाच नको, असा टोलाही राज यांनी यावेळी लगावला. 

शरद पवारांच्या पावसातील सभेपूर्वी कोणीही त्यांच्याबद्दल बोलले नाही. तसेच फडणवीस सत्ता स्थापन करू शकले नाही त्यानंतर त्यांच्याबद्दल कोणीही बोलले नाही, यावरून कळतं की, 'यशाला बाप खूप असताता, पराभवाला सल्लागार खूप असतात.' 

आपला देश म्हणजे काही धर्मशाळा नाही 
पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचे शिबिर घेतल्यानंतर आज (शनिवार) राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर वक्तव्य केले. नागरिकत्व कायद्यावरून देशभर आगडोंब उसळला असून, हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने मुळ मुद्द्यांवरून लक्ष हटविण्यासाठी असले कायदे आणले जात आहेत. आपला देश धर्मशाळा नाही, असे राज यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT