vasant more mns
vasant more mns 
पुणे

मला प्रभागात शांतता हवीय, मनसे पुणे शहराध्यक्षांनी धुडकावला राज ठाकरेंचा आदेश

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा झाली. राज ठाकरेंनी 'यू टर्न' घेतला असा टीकेचा सूर होताच, शिवाय त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला कृती कार्यक्रमही वादग्रस्त ठरला. मशीदीच्या समोर भोंगे लावल्यास हनुमान चालिसा लावा, असे आदेश ठाकरेंनी दिले. यानंतर राज्यात धार्मिक द्वेष वाढीस लागत असल्याचं बोललं जातंय.

मुंबईच्या कुर्ल्यात मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचं म्हटलं. काही ठिकाणचे भोंगे देखील उतरवण्याची तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मात्र, पुण्यात काही मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने असं कोणतंही पाऊल उचलणार नसल्याचं म्हटलंय. (Raj Thackeray)

राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आल्याचं मोरे यांनी स्पष्टीकरण दिलं. मशिदीवरील भोंगे काढणार नाही. तर हनुमान चालीसा लावणार, असं राज ठाकरे म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. अनधिकृत गोष्टी असल्यास राज्य सरकारने त्यावर कारवाई करावी, असं ते म्हणाले.

आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात. राज साहेबांच्या आदेशानंतर त्यांनी हनुमान चालिसा लावली. मात्रस मी माझ्या प्रभागात असं काही करणार नाही, असं मोरेंनी स्पष्ट केलं. सध्या रमजान सुरू आहे. त्यामुळे मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही, असं पुणे शहर मनसे प्रमुख वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT