रामवाडी : ''चंदननगर येथील दत्तप्रसाद सोसायटीत गेले आठ दिवसापासुन पिण्याचे पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याने रहिवाशांनी महापालिकेला ऑनलाईनद्वारे तक्रार करून त्याची दखल घेण्यात आली नसल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने सदर समस्याची दखल घेत पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी दिले जावे'' अशी मागणी येथील रहिवासी करीत आहे.
दत्तप्रसाद सोसायटी लेन नंबर तीन, चार, पाच या ठिकाणी दुपारी तीन ते पाच या वेळात पालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा नळाद्वारे पुरवठा होत असतो. गेले आठ दिवसांपासून गढूळ त्याच बरोबर पाण्याला दुर्गंधी येत असल्याने घरातील लहान मुलांपासुन जेष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. सध्या येथील रहिवाशांना पिण्याचे पाणी विकत घेण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याने अर्थिक गणित कोलमडले जात आहे. प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवली जावी'' अशी मागणी येथील रहिवासी करीत आहे.
''आठ दिवसांपासुन पिण्याच्या पाणी व ड्रेनेज पाणी एकत्रित मिक्स होत आहे. गढूळ व दुर्गंधी आणि पाण्यावर फेस येत आहे. काहींना जुलाब व उलट्याचा त्रास होत असल्याने पिण्यासाठी विकतचे पाणी आणावे लागत असल्याने अर्थिक खर्च वाढला आहे.''
- दिपक कुरपे : स्थानिक रहिवासी -
''सदर ठिकाणची प्रथम माहिती घेतो. ज्या काहीच्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत समस्या आहेत. त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील. ''
- मधुकर थोरात : उपअभियंता - बंडगार्डन पाणी पुरवठा विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.