पुणे

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना; मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चित्र

सकाळवृत्तसेवा

धायरी - मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून सतत अपघात होत आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणवर टीकेची झोड उठली. या पार्श्‍वभूमीवर अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान विविध उपयोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यानच्या मार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी आवाज उठविला.  महामार्गावरील विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपघात रोखण्यासाठी उपयोजना राबविण्यास सुरूवात केली आहे.

महामार्गावरील तीव्र उतारावर एकहजार पेक्षा जास्त स्टड लाइट बसवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रम्बलर्स, वेग मर्यादेचे फलक लावण्यात आले आहेत. वाहन चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहने हळू चालवा, अपघात प्रवण क्षेत्र असल्याने वाहने सावकाश चालवा, असे संदेश देणारे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महामार्गावरील अपघात कमी होण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी उपाययोजना केल्या आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. 
-सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला योग्य सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं : अमित शहा

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT