bhushan baraku dere
bhushan baraku dere sakal
पुणे

Narayangav News : मृत व्यक्तींच्या अंतिम वाटेवरचा वाटाड्या भूषण बारकु डेरे यांचे निधन

रवींद्र पाटे

नारायणगाव - येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, समाज भूषण किसन (बारकु) नरहरी डेरे (वय ७९) यांचे हृदयविकाराने निधन झाले. अंत्यविधी, सावडणे, दशक्रिया विधी ही कामे विना मोबदला ,स्वयंस्फूर्तीने करून हजारो मृत व्यक्तींचे अंतिम विधी करणारा बारकू काळाच्या पडद्याआड गेला. बारकूच्या निधनामुळे मागील पन्नास वर्षे हजारो मृत व्यक्तींच्या अंतिम वाटेवरचा वाटाड्या हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पांढरा शुभ्र पायजमा, नेहरू शर्ट , डोक्यावर टोपी, उंची पाच फूट, सडसडीत शरीरयष्टी असलेल्या बारकूचे नारायणगाव येथील पाटे आळीत वास्तव्य होते. अंतिम विधीसाठी असलेल्या स्वर्गरथ गाडीवर बारकू वाहनचालक म्हणून काम करत होता. एक वर्षांपूर्वी बारकूच्या पत्नीचे दीर्घ आजाराने निधन झाले. घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असताना स्वतःचे दुःख, वेदना बाजूला ठेवून बारकू मागील पन्नास वर्षे अंत्यविधी, सावडणे, दशक्रिया हे विधी विना मोबदला , स्वयंस्फूर्तीने करत होता. परिसरातील व्यक्ती मृत झाल्याची माहिती मिळताच बारकू हजर असे.

अंत्यविधीसाठी आवश्यक असणारे सर्व सोपस्कार बारकू करत असे. स्वर्गरथाचे सारथ्य स्वतः करून स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्य संस्कार झाल्या नंतर बारकू घरी जात. दुसऱ्या दिवशी सकाळीच सावडण्यासाठी हजर होत. बारकूच्या या कामामुळे विविध संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

सद्यस्थितीत विभक्त कुटुंब, शहरिकरण, नात्यागोत्यातील कमी झालेली प्रेम भावना या मुळे अंत्यविधी करणे ही एक समस्या झाली आहे. आजारी व्यक्तीचा अंत्यविधी करण्यासाठी जवळचे नातेवाईक टाळाटाळ करतात. अशा वेळेस बारकू स्वतः मृत व्यक्तीला आंघोळ घालण्यापासून सर्व कामे करत.

कोरोना काळात सुद्धा बारकूने कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले. या सेवेमुळे बारकू नारायणगाव, वारुळवाडी परिसरात सर्वांना हवाहवासा होता. अंत्यसंस्कार म्हटले की बारकू हा हक्काचा माणूस होता. गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी बारकूचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आज सकाळी येथील वैकुंठ स्मशानभूमीत मीना नदीच्या तीरी शोकाकुल वातावरणात बारकूवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी आमदार अतुल बेनके,सरपंच योगेश पाटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नारायणगाव, वारूळवाडी पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. बारकूच्या निधनामुळे नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT