Civil_Service_Students
Civil_Service_Students 
पुणे

सरळ सेवा भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार? अधिकारी काय म्हणाले पाहा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील हजारो तरूण राज्य सेवेतील वर्ग दोन आणि तीनच्या पदांची भरती व्हावी म्हणून 'महाआयटी'कडे डोळे लावून बसले आहेत. यासाठीच्या निविदेचे काम १० ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊन पदभरतीची प्रक्रिया सुरू होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. 

सरळ सेवा अतंर्गत जिल्हा परिषदेतील विविध पद, आरोग्य सेवक, शिपाई, कारकून, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोलिस, तलाठी यासह राज्य शासनाच्या विविध खात्यातील वर्ग दोन आणि तीनची पदे भरली जातात. हे काम पूर्वी महापरीक्षा पोर्टलकडे होते, पण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. डमी उमेदवार बसवून, गुणांमध्ये अफरातफर करून गुणवत्ता नसलेल्या उमेदवारांची निवड झाली. त्याचे पुरावेही समोर आले.

महापरीक्षा पोर्टलमध्ये त्रुटी असल्याने हे पोर्टल बंद करा या मागणीने जोर धरला होता. अखेर राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून त्या ऐवजी 'महाआयटी'तर्फे नवीन कंपनीला काम देण्यासाठी निवीदा प्रक्रिया राबविण्यास सुरू केली आहे. मात्र, दरवेळेला वेगवेगळी कारणे देऊन निविदा प्रक्रियेला मुदतवाढ दिली जात आहे. आत्तापर्यंत १९ वेळा मुदतवाढ दिल्याने भरती प्रक्रिया ठप्प आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, ते हवालदिल झाले आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी महाआयटीचे प्रमुख अजित पाटील यांच्याशी संपर्क साधला. निविदा प्रक्रिया पूर्ण कधी होणार आहे असे विचारले असता, पाटील यांनी, "१० ऑगस्टपर्यंत सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले आहे. त्यामुळे विविध खात्यातील भरती मार्गी लागण्याची शक्यता आहे. 

यादव म्हणाले, "सरळ सेवेसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, पण महापरीक्षा पोर्टलच्या ठिकाणी काम करण्यास दुसऱ्या कंपन्यांना उशीर लागत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण केल्यास उमेदवारांना थोडासा तरी दिलासा मिळेल.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT