Pimpri Chinchwadkar's water issue 
पुणे

पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली

संदीप घिसे

पिंपरी, (पुणे)- पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या पवना धरणात 90 टक्‍के पाणीसाठा झाल्याने शहरवासियांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

पवना धरणाची एकूण क्षमता 10.68 टीएमसी आहे. तर 8.5 टीएमसी हा जिवंत साठा आहे. यापैकी पाच टीएमसी पाण्याचा वापर पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता होतो. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाखांपेक्षा अधिक आहे. तर नळजोडांची संख्या एक लाख 41 हजार इतकी असून 490 एमएलडी पाण्याचा वापर शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता केला जातो.

पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासह तळेगाव, देहूरोड, वाघोली प्रकल्प यांनाही पाणी पुरवठा होतो. तसेच शेतीसाठी देखील पवना नदीतील पाण्याचा उपयोग होतो. पावसाळ्यातील चार महिने पावसाचे पाणी पवना नदीतून घेतले जाते. उर्वरित आठ महिने पवना धरणातून पाणी सोडले जाते. या सर्व योजनांना दरमहा धरणातील दहा टक्‍के पाणीसाठा लागतो. सध्या धरण 90 टक्‍के भरले असल्याने पिंपरी चिंचवडकरांच्या वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे.

गेल्या आठ दिवसापासून सध्या धरण परिसरात 20 ते 30 मिलिमीटर पाऊस पडत आहे. यामुळे धरण पाणीसाठ्यात दररोज किंचितशी वाढ होत आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, पवना धरणाचे शाखा अधिकारी ए.एम.गदवाल यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

मात्र, पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी सोडण्याबाबत त्वरित निर्णय घेतला जाईल. पाणी सोडण्यापूर्वी चार तास अगोदर सर्व संबंधितांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT