Prakash_Ambedkar_Modi
Prakash_Ambedkar_Modi 
पुणे

'पंतप्रधान मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात'; आंबेडकरांच्या टीकेचा रोख कुणाकडे?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मी दिल्लीत का जात नाही म्हणून मला विचारलं गेलं, पण माझा लढा हा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही, तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही. पंतप्रधान मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

वंचित बहुजन आघाडीतर्फे पुण्यात रविवारी (ता.७) गरीब मराठा समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंबेडकरांनी राज्यातील तसेच केंद्रातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं होतं. 

शेतकऱ्यांचं आंदोलन वस्तुस्थितीला धरूनच
राजधानी दिल्लीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन हे वस्तुस्थितीला धरून आहे. कृषी हा राज्याचा विषय आहे. काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा करण्यापासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आम्ही रोखू शकलो नाही. मी दिल्लीत का जात नाही म्हणून मला विचारलं गेलं, पण माझा लढा हा राज्यात आहे. राज्यात लढा पूर्ण होत नाही, तोपर्यंत दिल्लीत जाणार नाही. पंतप्रधान मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. त्यांचा रोख शरद पवारांकडे होता की आणखी कुणाकडे याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. 

आंबेडकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने कायदा रद्द केला तर देशातील कायदा आपोआप रद्द होतो. कायदा रद्द करणं हे पूर्णपणे राज्यावर अवलंबून आहे. पण तीन पायाच्या सरकारला हा कायदा रद्द करण्यास काय अडचण येत आहे, हे कळत नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवायचा असतील, तर काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा रद्द करण्याची गरज आहे.

काँट्रॅक्ट फार्मिंगमुळे पुन्हा सावकारी सुरू होतील आणि जमिनी जातील. जर असं झालं, तर शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही. बाजार समिती ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची संकल्पना होती. कसेल त्याची जमीन असा कायदा केला होता. पण उत्पादनाची लूट होण्याबाबत काहीही केलं नाही. आम्ही दोन मागण्या केल्या, पण त्याकडे लक्ष दिलं नाही, असा आरोपही आंबेडकर यांनी सरकारवर केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT