पुणे - जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती कोविड अथवा अन्य कोणत्याही आजाराने मरण पावली आहे. त्या व्यक्तीच्या खात्यातून दरवर्षी प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचे ३३० रूपया हप्ता कपात होत असेल. तर त्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी संबंधित बॅंकेत जाऊन त्याबाबतचा पुरावा सादर केल्यास कुटुंबीयांना दोन लाख रूपायांची भरपाई मिळू शकते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
केंद्र सरकारने ९ मे २०१५ पासून देशभरात प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अशा दोन योजना देशभरात लागू केल्या. १८ ते ५० या वयोगटातील नागरिकांना या योजना लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३३० रूपये आणि १२ रूपये असा दोन वार्षिक हप्ता भरावा लागतो. संबंधित व्यक्तीचा मूत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुंटुबीयांना दोन लाख रूपयांची भरपाई म्हणून दिली जाते.
त्यासाठी दरवर्षी ३१ मेपर्यंत संबंधित व्यक्तीने विमा भरणे आवश्यक आहे. या योजनेचा फॉर्म भरून दिल्यानंतर दरवर्षी तुमच्या बॅंकेच्या खात्यातून थेट (इसीएस) या योजनेचा हप्ता भरला जातो. परंतु अनेकांना या योजनेचा कशा प्रकारे फायदा होतो, याची माहिती नसते. त्यामुळे त्याचा कुटुंबीयांना लाभ मिळत नाही.
क्लेमसाठी काय आवश्यक आहे.
प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचे जे सभासद आहेत. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांना दोन लाख रूपयांची भरपाई मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुटसुटीत आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यायला हवा.
- वरिष्ठ अधिकारी, बॅंक ऑफ महाराष्ट्र
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.