Triple Talaq sakal
पुणे

Triple Talaq : ट्रिपल तलाकप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल, पतीला अटक

विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. न्यायालयाने पतीला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून, त्याला जामीन दिला आहे. दरम्यान, सासू, सासरा, नणंद आणि नंदावा यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

या संदर्भात २३ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती आणि सासरच्या लोकांनी विवाहितेवर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पतीने तीन वेळेस तलाक म्हणत नांदवण्यास नकार दिला. तसेच, पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास नणंदेच्या पतीने जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून खडकी पोलिसांनी पती अकीब आयुब मुल्ला (वय ३१, रा. नवीन नाना पेठ, पद्मजी पार्क, पुणे) याला अटक केली.

पतीसह सासू, सासरा, नणंद आणि नंदावा यांच्याविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा २०१९ चे कलम ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध ९ मे रोजी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी २३ मे रोजी पतीला ट्रिपल तलाकच्या गुन्ह्यात अटक केली. ट्रिपल तलाकप्रकरणी पतीला अटक झाल्याची ही पुण्यातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. ही घटना २३ डिसेंबर २०२२ ते १७ एप्रिल २०२३ या कालावधीत घडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT