पुणे

संगीतात साधनाच गरजेची - कौशिकी चक्रवर्ती 

सकाळवृत्तसेवा

पुणे - ""तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर त्यासाठी खोलवर जावे लागते, एखाद्या वृक्षाच्या मुळासारखे. लहान झाडे जास्त काळ उभी राहत नाहीत. संगीतातही तसेच आहे. तुम्हाला चांगला कलाकार व्हायचे असेल तर दहा-पंधरा वर्षे बंदघरात रियाज करावा लागतो. याला कुठलाही "शॉर्टकट' नाही. ती साधना केलीत तर तुम्हाला खरी जागा मिळेल. ही खरी जागा दैनिकांच्या पानांत किंवा संगीताच्या मैफलीत नसते. ती स्वत:च्या आणि गुरूच्या नजरेत असते...'' प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती तालमीचे महत्त्व सांगत होत्या. 

शास्त्रीय संगीतात "कौशिकी चक्रवर्ती' हे नाव चांगलेच चर्चेत आहे. श्रोत्यांना कौशिकी यांचे गाणे किती सुरेल आहे, हेच माहिती आहे; पण ते सुरेल होण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत फारशी माहिती नाही. या मेहनतीला त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवातील "अंतरंग' या कार्यक्रमात उजाळा दिला. त्यांच्या सुरेल संवादानेच बुधवारी या कार्यक्रमाची सुरवात झाली. श्रीनिवास जोशी यांनी त्यांना विविध विषयांवर बोलते केले. 

कौशिकी म्हणाल्या, ""सुरवातीला आम्हाला खडतर संघर्ष करावा लागला. गरिबीमुळे विकत दूध घ्यावे, अशी परिस्थिती नव्हती. अंडीसुद्धा घेता यायचे नाही. त्यामुळे कोंबडीच घरात पाळली होती. एका चांगल्या नोकरीसाठी वडिलांना बॅंकेतून कॉल आला; पण आजोबांनी तो कागद फाडून टाकला. माझा मुलगा "कलावंत'च होईल, असे त्यांचे म्हणणे होते. एकीकडे गरिबीशी संघर्ष आणि दुसरीकडे संगीतावरील प्रेम... अशा स्थितीत वडील उभे राहिले. अनेक गुरूंकडून त्यांनी संगीताची विद्या ग्रहण केली.'' 

"दंगल'मधील "ती'ही मीच 
""वडिलांनी मला गाण्यात तयार केले. दिवसाची सुरवात त्यांचे गाणे ऐकतच व्हायची. त्या वेळी घर लहान होते. अनेक शिष्य घरी शिकायला यायचे. मग मला जागाच नसायची. अशावेळी तासन्‌तास बाथरूममध्ये बसून मी रियाज केला. त्यांनी फक्त गाणेच शिकवले असे नाही, संस्कारही दिले. "दंगल' चित्रपटातील त्या मुलींच्या जागेत मी स्वत:ला पाहते. त्या वडिलांइतकेच कष्ट माझ्या वडिलांनी माझ्यावर घेतले. गाताना डुलकी लागली की त्यांचा मारही बसला. त्यामुळे ते "हिटलर'सारखेच वाटायचे,'' अशा आठवणीही कौशिकी यांनी सांगितल्या. पतियाला घराण्याबद्दल त्या म्हणाल्या, ""इतर घराण्यांप्रमाणे या घराण्यात गायन सादर करताना काही नियम, टप्पे नाहीत. त्यामुळे हे आकारमुक्त गायन शिकणे, हेच आव्हान आहे.'' 

पंडितजी, बर्गर आणि मी 
""एकेदिवशी आम्ही घरात एकत्र बसलो होतो. तेवढ्यात फोन आला. मी घेतला अन्‌ हॅलो म्हणाले. तर पलीकडून, "हं... कौशिकी, मी भीमसेन जोशी बोलतोय.' हा आवाज कानावर पडताच मी काहीवेळ स्तब्धच राहिले. त्यांना काय बोलावे, हे कळेना. मग पंडितजीच म्हणाले, "तुला "सवाई'ला यायचं आहे'. तो दिवस मी आजही विसरू शकत नाही. ते "सवाई'त माझे येणे हे पहिलेच होते. इथे आले आणि आजारीच पडले. का तर माझ्या आधी पं. शिवकुमार शर्मा हे संतूरवादन सादर करणार होते. त्यांच्यानंतर माझे गाणे आणि माझ्यानंतर पंडित जसराजजींचे. असा क्रम असेल तर कोणीही आजारी पडणारच की. शेवटी मी भीत-भीतच गायला बसले. शिवजींच्या सादरीकरणानंतर "कोण ही कौशिकी?' असे म्हणत श्रोते शंभर-शंभरच्या संख्येने उठून बाहेर जाऊ लागले; पण गाणे सुरू झाले आणि गर्दी पुन्हा जमू लागली. ती चाळीस मिनिटेसुद्धा मला कधीही विसरता येणार नाहीत...,'' "सवाई'तील पहिल्या अनुभवाविषयी कौशिकी भरभरून बोलत होत्या. 

आज "षड्‌ज' आणि "अंतरंग'मध्ये 
(वेळ : सकाळी दहा, स्थळ : सवाई गंधर्व स्मारक) 
- पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील लघुपट 
- ज्येष्ठ तबलावादक नाना मुळे यांची मुलाखत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT