पुणे

Pune : हांडेवाडी रोडवरील खड्ड्यांमुळे वाहनांपेक्षा आरोग्याची मोठी हानी

तेजस भागवत

उंड्री : कात्रज-मंतरवाडी बायपास रस्त्याला जोडणारा हांडेवाडी रस्ता महत्त्वाचा असून, या परिसरात नागरीवस्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. वाहनचालकांना रस्ता नव्हे, तर खड्ड्यातून वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे वाहनांपेक्षा आरोग्याची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने पालिकेच्या रस्ते विभागाने आता तरी, रस्त्याच्या कामासाठी मुहूर्त न पाहता काम सुरू करावे, अशी मागणी नोकरदार, कामगार, वाहनचालकांसह स्थानिकांकडून केली जात आहे.

स्थानिक नागरिक गणेश वाडकर, संजय भुजबळ, संतोष सातव, अरुण कुदळे, इम्रान मणियार, स्वप्नील नेवसे, संदीप राऊत, मनोज राऊत, धनराज शिवरकर म्हणाले की, हांडेवाडी रोड मागिल अनेक वर्षांपासून पालिकेकडे वर्ग केला असूनही या रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागत नाही. या रस्त्याच्या विकासासाठी १९९२ साली डीपी रोडला मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात रस्ता उखडल्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम केले जाते. या रस्त्याच्या विकासाच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो, त्याचे काय केले जाते, असा संतप्त सवाल निवासी संकुलांतील नागरिक आणि औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी उपस्थित केला आहे.

सय्यदनगर रेल्वेगेट ते हांडेवाडी चौकापर्यंत तीन-चार किलोमीटर लांबीचा असून, हा रस्ता नकाशावर डीपी रोड ८० फुटी रस्ता मंजूर असला, तरी सध्या वापरात फक्त ४० फुटी आहे. रेल्वेगेट-वागजाई मंदिरापर्यंत २५ फुट, श्रीराम चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत (जे.एस.पी.एम.) ४० फूट आणि तेथून पुढे हांडेवाडी चौकापर्यंत ३० फूट रुंदीचा रस्ता आहे. अनेक दुकानदारांनी ओटा बांधून तेथे पोटभाडेकरू ठेवले आहेत, अॅमॅनिटी स्पेसवर अनधिकृतपणे व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. भाजीविक्रेते, फळविक्रेते, बेवारस वाहने, दुकानदारांची अतिक्रमणे वाढल्याने रस्ता अरुंद झाला असून, दररोज वाहतूककोंडीचा त्रास स्थानिकांसह वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

सय्यदनगर रेल्वेगेट ते श्रीराम चौकापर्यंत एकेरी केला असला, तरी नियमांचे उल्लंघन करून सर्रास दुतर्फा वाहने सुरू असतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना कायम तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई केली जात नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. वाहतूक पोलिसांनी कोणाच्या दबावाला बळी न पडता कारवाई केली पाहिजे. या रस्त्यावर पाण्याच्या टँकरची वर्दळ सुरू असते. टँकरमधून पाणीगळती होत असल्याने रस्ता ओला होतो आणि दुचाकी घसरून सतत अपघात होत आहेत.

हांडेवाडी रोडवर पावसाळी वाहिनी नसल्यामुळे पाऊस झाल्यानंतर ठिकठिकाणी पाणी साचून राहते. त्यामुळे नागरिकांना पाण्यातून ये-जा करावी लागते. या रस्त्यावर पादचारी मार्ग नाही, सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे. लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे अधिकारी-कर्मचारीही या रस्त्याने ये-जा करतात. मात्र, त्यांच्या महागड्या वाहनांच्या काचा बंद असतात, त्यामुळे खड्डे आणि वाहनचालकांची जीवघेणी कसरत दिसत नाही. खड्ड्यांमध्ये अपघात झाल्यानंतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर कारवाई केली पाहिजे, असा सबुरीचा सल्ला डॉ. सतीश झगडे यांनी दिला आहे.

दरम्यान, महापालिकेचे शाखा अभियंता अविनाश कामठे म्हणाले की, हांडेवाडी रोडसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी जागा मालकांना नोटीस दिल्या आहेत. त्याचबरोबर रस्ता करण्यासाटी काही तांत्रिक अडचणी आहेत. जागा ताब्यात मिळाल्यानंतर तातडीने या रस्त्याचे काम मार्गी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB : आरसीबीच्या गोलंदाजांनी सामना आणला खेचून, प्ले ऑफच्या आशा ठेवल्या जिवंत

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT