Savitribai Phule Pune University sakal
पुणे

Pune Crime : ९० दिवस चालणारी परीक्षा अवघ्या ३६ दिवसांत पूर्ण करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने ९० दिवस चालणारी परीक्षा अवघ्या ३६ दिवसांत पूर्ण केली.

सम्राट कदम

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने ९० दिवस चालणारी परीक्षा अवघ्या ३६ दिवसांत पूर्ण केली. मात्र, अंतर्गत मुल्यमापणासून ते उत्तरपत्रिका तपासण्यापर्यंत काही प्राध्यापक आणि महाविद्यालयांचे सहकार्य न मिळाल्याने विभाग मेटाकुटीला आला असून, आता संबंधितांना नोटिसा बजाविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लावण्यासाठी प्राधान्य द्यावे की नोटिसा बजावण्यात वेळ घालवावा, असा उद्विग्न सवाल विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी उपस्थित केला.

पेपर तपासणीस टाळाटाळ करणाऱ्या आणि अंतर्गत मूल्यांकनाला उशीर करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणार का?, असा थेट प्रश्न विचारले असता. डॉ. काकडे यांनी हे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘परीक्षांचे निकाल वेळेत लागावेत यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे.

त्यासाठी २५० पेक्षा जास्त कॅप सेंटर निर्माण करण्यात आले असून, बहुतेक महाविद्यालये आणि प्राध्यापकांनी सहकार्य केले. मात्र, काही महाविद्यालयांच्या हलगर्जीपणामुळे निकालांना उशीर होत आहे. अनेकवेळा मुदतवाढ देऊनही महाविद्यालयांचे अंतर्गत गुणदान अपूर्ण आहे.

लाखो विद्यार्थ्यांच्या गुणांच्या विदाची संगणकीय प्रणालीत समाविष्ट आव्हानात्मक काम आहे. एक महाविद्यालय मागे राहिल्या संपूर्ण निकालास उशीर होतो.’’ सध्या परीक्षा विभाग रात्री अकरावाजे पर्यंत काम करत असून, सर्व महत्त्वपूर्ण विषयांचे काल ३१ जुलै पर्यंत घोषित होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

होतंय काय?

विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये मान्यताप्राप्त प्राध्यापकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल लावणे बंधनकारक आहे.

परंतु, पुणे शहरातील एका नामांकित महाविद्यालयाने उत्तर पत्रिका तपासून देण्यास तब्बल १०० दिवसांहून अधिक कालावधी लावला. त्यामुळे विद्यापीठातर्फे या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लावण्याची जबाबदारी जशी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची आहे, तशीच ती प्राध्यापकांची सुद्धा आहे.

प्राध्यापकांना परीक्षेचे काम टाळता येत नाही. परंतु, विद्यापीठाशी संलग्न अहमदनगर जिल्ह्यातील ३ विधी महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी परीक्षेच्या कामात हलगर्जीपणा केला. त्यामुळे परीक्षा विभागातर्फे १२ प्राध्यापकांना नोटीस बजावण्यात आली आहे. एकूण १५० पेक्षा जास्त प्राध्यापकांना नोटीस बजावण्यात येणार आहे.

आकडे बोलतात...

- एकूण अभ्यासक्रम - १३९

- एकूण विद्यार्थी - ६ लाख ५० हजार

- उत्तरपत्रिकांची संख्या - ४५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT