lal mahal jijamata  esakal
पुणे

Rajmata Jijau Jayanti : जिजाऊंनी खरंच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला होता का? काय होते कारण

स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवण्याचा हा प्रसंग अखंड महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय आहे. याच दोन महान व्यक्तिमत्त्वांनी महाराष्ट्र घडवला. त्याचीच गोष्ट आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडावर स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्र घडवला. त्यापूर्वी परकीय शत्रूंच्या कोंडीमध्ये हा प्रदेश सापडला होता. शहाजीराजे निजामशाहीत असताना मुरार जगदेव याने पुण्यावर हल्ला केलाय त्यावेळी पुण्यात भीषण दुष्काळ पडला होता.

तरीही शहाजीराजेंना आव्हान द्यायचं म्हणून त्याने पुणे उध्वस्त केलं. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला आणि पहार मारली. इथल्या प्रदेशात कधीच समृद्धी येणार नाही, याचं ते सूचक होतं. अशी घटना घडल्यावर त्या जागेवर कुणी फिरकायचं नाही, ते अशुभ असतं, हे त्यावेळी मानलं जायचं.

गाढवाचा नांगर फिरल्यानंतर पुणे उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर इथली जहागीर पुन्हा एकदा शहाजीराजांच्या ताब्यात आली आणि बाल शिवाजीसह जिजाऊ पुण्यामध्ये दाखल झाल्या. त्यांनी पुण्याचं वैभव परत आणण्याचा चंग बांधला आणि बाल शिवाजीसह पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला. हे प्रतिकात्मक होतं. त्यानंतर या भागामध्ये वस्त्या उभारल्या गेल्या. जमिनी कसल्या. खऱ्या अर्थाने या दिवशी हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Gas Shortage: केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

KBC Contestant Arrest : 'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक धक्कादायक कारण आले समोर

Hardik Pandya ची मन जिंकणारी कृती; मुंबईच्या ग्राऊंड्समन्सना केली आर्थिक मदत... कारण ऐकून वाढेल आदर...

SCROLL FOR NEXT