lal mahal jijamata  esakal
पुणे

Rajmata Jijau Jayanti : जिजाऊंनी खरंच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला होता का? काय होते कारण

स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवण्याचा हा प्रसंग अखंड महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय आहे. याच दोन महान व्यक्तिमत्त्वांनी महाराष्ट्र घडवला. त्याचीच गोष्ट आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडावर स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर महाराष्ट्र घडवला. त्यापूर्वी परकीय शत्रूंच्या कोंडीमध्ये हा प्रदेश सापडला होता. शहाजीराजे निजामशाहीत असताना मुरार जगदेव याने पुण्यावर हल्ला केलाय त्यावेळी पुण्यात भीषण दुष्काळ पडला होता.

तरीही शहाजीराजेंना आव्हान द्यायचं म्हणून त्याने पुणे उध्वस्त केलं. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला आणि पहार मारली. इथल्या प्रदेशात कधीच समृद्धी येणार नाही, याचं ते सूचक होतं. अशी घटना घडल्यावर त्या जागेवर कुणी फिरकायचं नाही, ते अशुभ असतं, हे त्यावेळी मानलं जायचं.

गाढवाचा नांगर फिरल्यानंतर पुणे उद्ध्वस्त झालं होतं. त्यानंतर इथली जहागीर पुन्हा एकदा शहाजीराजांच्या ताब्यात आली आणि बाल शिवाजीसह जिजाऊ पुण्यामध्ये दाखल झाल्या. त्यांनी पुण्याचं वैभव परत आणण्याचा चंग बांधला आणि बाल शिवाजीसह पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला. हे प्रतिकात्मक होतं. त्यानंतर या भागामध्ये वस्त्या उभारल्या गेल्या. जमिनी कसल्या. खऱ्या अर्थाने या दिवशी हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs UAE U19 : भारताच्या ४३३ धावा! वैभव सूर्यवंशीच्या १७१ धावा U-19 रेकॉर्ड बूकमध्ये नोंदवल्या जाणार नाहीत; जाणून घ्या कारण

"तर माझं संपूर्ण कुटूंब आंदोलनात उतरेल" मराठी भाषेच्या प्रश्नावर सुमित राघवन झाला व्यक्त ; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साजरी केली गोपीनाथ मुंडेंची जयंती

Ladki Bahin Yojana: ई-केवायसीला मुदतवाढ; अडचणी कायम, ‘लाडकी बहीण’ला सर्व्हर डाऊनचा अडथळा

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये 'एक नंबर'ची लढाई! नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुद्ध शिंदेसेनेचा ‘स्ट्रेट फाइट’

SCROLL FOR NEXT