Raju shetty Criticism on CM Uddhav Thackeray 
पुणे

ठाकरेंना 25 हजार रुपये हेक्‍टरी मदतीचा विसर : राजू शेट्टी यांची टीका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झालेले असताना उद्धव ठाकरे यांनी हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली होती. पण आता त्यांचेच सरकार आल्यावर त्यांना याचा विसर पडला आहे. निधी नसल्याने ते केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. केंद्रानेही शेतकऱ्यांची निराशा केली, अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता राजू शेट्टी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "भाजपने कर्जमाफी केल्याची थाप मारली. पण शेतकऱ्यांना त्यातून काहीच फायदा झालेला नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस सत्तेय येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे सांगितले होते. या सरकारने केलेली कर्जमाफीही तकलादू आणि बिनकामाची आहे. केंद्र सरकारने तुरीचा हमीभाव 5 हजार 800 रुपये जाहीर केला आहे, पण बाजारात केवळ 4 हजार 300 रुपये मिळत आहे. सरकारने डाळ खरेदीसाठी व्यवस्था केलेली नाही. प्रती क्विंटल 1 हजार 500 रुपये नुकसान शेतकऱ्याला होत असून, त्याचे पैसे थेट बॅंकेत जमा करावेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

Delhi Election : तिवारी म्हणाले होते 'ट्विट जपून ठेवा'; निकालनंतर होतायेत ट्रोल

स्वाभिमानीचा व्हेलंटाईन डे
राज्यातील ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. ग्रामीण विद्यार्थी अणि शहरी नागरिक यांच्यात प्रेमाचे संबंध निर्माण व्हावेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून "व्हॅलेंटाइन डे' साजरा केला जाणार आहे. त्यासाठी गुरूवारी सकाळी साडे दहा वाजता नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकापासून कृषी महाविद्यालयापर्यंत "प्रेम यात्रा' काढली जाणार आहे, त्यात नागरिकाना गुलाबाच्या फुलांचे वाटप केले जाणार आहे,'' असे शेट्टी यांनी सांगितले.

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया

आम्ही आप सोबत जाऊ शकतो
"भाजपने जाती-धर्मांत तेढ निर्माण करून, मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न दिल्लीच्या निवडणुकीत केला, पण आम आदमी पक्षाने शिक्षण, आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांवर प्रचार केला. चांगला प्रशासक लाभला, तर मतदारही जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन विचार करतो, हे या निकालातून कळाले. आप आणि स्वाभिमानीचे जुने मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मीच केजरीवाल यांना 20-13 मध्ये सांगलीत आणले होते. आमची मैत्री नैसर्गीक आहे, त्यामुळे आम्ही एकत्र येत्र शकतो, ही शक्‍यता कायम आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT