Shripad Naik statement Spirituality universal philosophy will make India powerful sakal
पुणे

आध्यात्म, वैश्विक तत्त्वज्ञान भारताला विश्वगुरू बनवेल - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

साधू-संत, महंतांच्या सान्निध्याने वातावरण आध्यात्मिक व भक्तिमय झाले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'आध्यात्म हीच भारताची खरी शक्ती होती. गेल्या काही वर्षांत तिची ओळख पुन्हा जनतेला होत आहे. या शक्तीचे संवर्धन करून आध्यात्म, वैश्विक तत्वज्ञान आणि संत-महात्त्म्यांचा आशिर्वाद हा भारताला विश्वगुरू बनवण्याचे स्वप्न साकार करेल,' असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.

साधू-संत, महंतांच्या सान्निध्याने वातावरण आध्यात्मिक व भक्तिमय झाले होते. महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान व मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक फाउंडेशनच्या पुढाकारातून पुण्यात आयोजित साधू-संत-महंत संमेलन व दर्शन सोहळ्यात नाईक बोलत होते.

गंगाधाम चौकातील वर्धमान सांस्कृतिक भवनमध्ये रविवारी (ता. ५) आयोजित या संमेलनास हरियाणा येथील महंत कालिदास महाराज, पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंत्री अशोक महाराज, हरिद्वार येथील महामंडलेश्वर प्रेमगिरी महाराज,

हरिगिरी महाराज, किन्नर जुना आखाड्याच्या महामंडलेश्वर दीपा राजमाने (जगवाली), महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्यासह अनेक मठाधिपती, नागा साधू उपस्थित होते. याप्रसंगी उद्योजक फत्तेचंद रांका, माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल गायकवाड आदींची उपस्थिती होती.

नाईक म्हणाले, 'संतांच्या आशिर्वादांमुळे सत्य आणि नीतीमत्तेच्या मार्गावर चालत राहिलेला हा देश सातत्याने प्रगतिपथावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणाला नवी दिशा देत आहेत. साधू-संतांचे आशीर्वाद व मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. साधू-संतांच्या मार्गदर्शनात आपल्या जीवनाचे समाधान, विश्वाचे कल्याण होणार आहे.'

कालिदास महाराज म्हणाले, 'काही वर्षांपूर्वीपर्यंत श्रीराम मंदिराचा मुद्दा वादात होता. तो प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी कौशल्याने मार्गी लावला. गंगा स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबविले जात आहे.

आता केंद्र सरकारने गोवंश संरक्षण आणि संवर्धनावर लक्ष्य केंद्रित केले पाहिजे. गोवंश असेल तर देश टिकेल आणि गोवंश असेल तर भारताला वैश्विक महाशक्ती होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. युवा पिढीने सद्सद्विवेकबुद्धीने काम करावे.'

संमेलनात विश्वशांती महायज्ञ, सुंदरकांडाचे प्रस्तुतीकरण, भजन व प्रवचन, भंडारा, गोमाता पूजन करण्यात आले. मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक राष्ट्रीय फाउंडेशनचे लोकार्पण व संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अतुल नरहरी भोसले, राहुल गोसावी मित्र परिवार, महामंडलेश्वर शिवानंद महाराज प्रतिष्ठान, सर्वात्मक महारुद्र परिवार, मैत्री प्रतिष्ठान, शिवाजी करंजुले, नंदकिशोर शहाडे, ललित तींडे, भरत मिसाळ, डॉ. इंद्रजित यादव, ऍड. महेंद्र दलालकर यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषण कोरोनापेक्षाही घातक, 'या' लोकांना ताबडतोब शहर सोडण्याचा सल्ला

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना! 'जमिनीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार';खोटे मृत्युपत्र तयार करुन जमीन बळकावली..

Latest Marathi News Live Update : ..अखेर प्रशासनाला आली जाग; कारखानदार-संघटनांची आज महत्त्वाची बैठक

Daily horoscope: आजचे राशिभविष्य-३ नाेव्हेंबर २०२५

महिला वर्ल्ड कपच्या ५२ वर्षांच्या इतिहासात कुणाला जमलं नव्हतं, दीप्तीने केला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT