neelam-gorhe 
पुणे

अंतिम वर्ष परीक्षेच्या नियोजनात विद्यापीठांची मनमानी थांबवा; उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे निर्देश

ब्रिजमोहन पाटील

पुणे - अंतिम वर्ष परीक्षेच्या नियोजनात विद्यापीठे स्वायत्ततेचा फायदा घेत मनमानी करत आहेत. विद्यार्थ्यांवर याचा प्रतिकूल परिणाम होत असून, मनोबल खच्चीकरण होत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठांच्या मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर परीक्षांचे सुसूत्रीकरण करावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील विद्यापीठे अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेद्वारे (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन -एमसीक्‍यू) घेणार आहेत. विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने दीर्घोत्तरी व वर्णनात्मक उत्तरे लिहिण्याची सवय आहे. एमसीक्‍यू परीक्षेत विद्यार्थ्यांचा गोंधळ उडण्याची शक्‍यता आहेच, शिवाय ऑनलाइन नंतर ऑफलाइन परीक्षा होणार असल्याने ऑनलाइन परीक्षेत कोणते प्रश्न विचारले गेले आहेत हे आधीच कळणार आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा देताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यावर पुनर्विचार व्हावा अशी सूचन गोऱ्हे यांनी दिली आहे.

राज्यातील विद्यापीठे स्वायत्ततेच्या आधारे कोणताही संवाद, विचारविनिमय न करता विविध घोषणा व परीक्षेचे निर्णय घेत आहेत. त्यात सुसूत्रीकरण करणे गरजेचे आहे, त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर विचार करुण आराखडे देण्यास सर्व विद्यापीठांना सूचना द्यावी. विद्यापीठांच्या अशा मनमानीमुळे विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होत मनोबल खच्चीकरण होत आहे. त्यामुळे परीक्षांचे सुसूत्रीकरण आपल्या विभागाने करावे असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सावंत यांना दिले आहेत.

लोकप्रतिनिधींना विचारात घ्या
राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये होत असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना सहभागी करून घेतले जाते नाही, त्यामुळे कुलगुरूंनी लोकप्रतिनिधींनाही विचारात घ्यावे, असेही गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India in WC Final: थँक्स टू Jesus! भारताला फायनलमध्ये पोहोचवल्यावर जेमिमा रॉड्रिग्ज भानविक झाली; म्हणाली, शतकापेक्षा भारत जिंकणं महत्त्वाचं होतं...

IND beat AUS in Semi Final: विजयी धाव अन् जेमिमा रॉड्रिग्जसा अश्रू अनावर, हरमनप्रीत कौरही रडली; मुंबईच्या पोरीने मोडला गौतम गंभीरचा विक्रम Video Viral

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

SCROLL FOR NEXT