पुणे

आरक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची दिशाभूल; बाबा आढाव

अलका टॉकीज चौकात आंदोलन

सकाळ वृ्त्तसेवा

पुणे : भारतीय राज्यघटनेतील कलम ४१ मध्ये रोजगाराचा आणि शिक्षणाचा अधिकार राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आला आहे. मात्र सरकार विद्यार्थ्यांची कलम १६ अर्थात आरक्षणाच्या मुद्द्याने दिशाभूल करत असून, त्यामुळे रोजगार आणि शिक्षणाच्या मूलभूतच अधिकाराकडे दुर्लक्ष होत आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

अलका टॉकीज चौकात अभ्यासिका विद्यार्थी समितीच्यावतीने रोजगाराची मागणी करणारे आंदोलन करण्यात आले. त्यात ते बोलत होते. आंदोलनात कॉग्रेसचे नेते माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते. यावेळी स्पर्धा परिक्षेचा तणाव आणि भरतीतील दिरंगाईमुळे आत्महत्या करणाऱ्या स्वप्नील लोणकर या उमेदवारास श्रद्धांजली वाहण्यात आली होती. बेरोजगारी हे संकट भांडवली व्यवस्थेचा परिणाम आहे. कंत्राटीकरणामुळे रोजगाराची समस्या वाढत असून, तरुणांची आरक्षणाच्या नावाखाली दिशाभूल करण्यात येत आहे. रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकार झालाच पाहिजे, असे मत आढाव यांनी व्यक्त केले. यावेळी विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

Gulshan Kumar यांच्या हत्येचं रहस्य २८ वर्षांनंतर उघड, मृत्यूच्या दीड वर्षाआधीच रचला होता कट, तपास अधिकाऱ्यांनी सांगितली आतली गोष्ट

SCROLL FOR NEXT