Ruppes-bank Sakal
पुणे

रुपीच्या ठेवीदारांसाठी अर्थमंत्र्यांना साकडे

बँकेच्या समस्येचे लवकर निराकरण करून ठेवीदारांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: रुपी सहकारी बॅंकेच्या समस्येचे निराकरण करून ठेवीदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार गिरीश बापट आणि रुपी बॅंकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली. खासदार बापट आणि ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय प्रचारप्रमुख भालचंद्र कुलकर्णी यांच्यासमवेत रुपी बँकेचे प्रशासक पंडित यांनी ११ ऑगस्ट रोजी अर्थमंत्री सीतारामन यांची दिल्लीत भेट घेतली.

शतकोत्तर इतिहास असणारी रुपी बँक गेली आठ वर्षे रिझर्व्ह बँकेच्या सर्वंकष निर्बंधाखाली आहे. त्यामुळे बँकेच्या समस्येचे लवकर निराकरण करून ठेवीदारांना दिलासा मिळणे आवश्यक आहे. व्यवहार्य दृष्टिकोन ठेवून प्रागतिक व वैविध्यपूर्ण उपाययोजना केल्यास हा प्रलंबित प्रश्न सुटू शकेल. तसेच, नागरी सहकारी बँक क्षेत्रावरही त्याचा चांगला परिणाम होईल. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात बँकेच्या प्रश्‍नावर दीर्घकालीन उपाययोजना त्वरित होण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

"रुपी बँकेच्या प्रश्‍नावर रिझर्व्ह बँकेने वेळीच दीर्घकालीन तोडगा काढला असता तर सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाल्या असत्या. गेली आठ वर्षे प्रश्न रखडल्यामुळे ठेवीदार तणावाखाली आहेत. अनेकांना आर्थिक विवंचनेतून जावे लागत आहे. उदार व व्यवहार्य दृष्टिकोन ठेवून रिझर्व्ह बँकेने योग्य उपाययोजना करून विमा संरक्षित नसलेल्या ठेवीदारांचेही हित जपावे". सीए सुधीर पंडित, प्रशासक- रुपी सहकारी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT