पुणे : तुम्ही आजपर्यंत तेल, शेंगदाणे, मिर्ची पावडर आदी महागड्या खाद्यपदार्थांत भेसळ झाल्याचे ऐकले असेल, कदाचित स्वतःही अनुभव घेतला असेल. परंतु मिठातही भेसळ झाल्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या कृत्रीम तुटवड्याबरोबरच भेसळीलाही सुरवात झाली आहे. रेसकोर्स परिसरातील फातिमा नगर परिसरातील प्रेमचंद सावंत यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सावंत म्हणतात,"लॉकडाउनमध्ये जवळच्याच दुकानातून आम्ही टॉप कुक ब्रांडचे मिठ खरेदी केले होते. भाजीमध्ये मीठ टाकले तरी भाजी बेचव लागत होती. माझे पाय आखडून बसले होते. जेवणातही बारीक खडे असल्यासारखे वाटायचे. आम्ही सर्व पदार्थ चेक केले. तर मिठामध्ये आम्हाला गडबड दिसली. पाण्यात टाकल्यानंतरही ते विरघळत नव्हते. शेवटी उकळत्या पाण्यात मीठ टाकले तर त्यातून उग्र वास येत होता.''
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भेसळयुक्त मिठामूळे लहान मुलांचे आरोग्याचे प्रश्न उद्भवू शकतात. त्यामुळे प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने दखल घ्यायला हवी. लॉकडाउनच्या कालखंडात चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक किरणामालाचा पूरवठा होणे गरजेचे आहे. नाहीतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल.
आणखी वाचा - आता कायमचं घरी बसा, आयटी कर्मचाऱ्यांना येतायत मेसेज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.