आंधळगाव,ता.१३ : महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करणे बंधनकारक असताना, कोळगाव डोळस (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीत सोमवारी (ता. १२) ही जयंती साजरी करण्यात न आल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी ग्रामस्थ ऋषिकेश यशवंत धुमाळ यांनी पंचायत समिती शिरूर येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार सोमवारी (ता. १२) कोळगाव डोळस येथील ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली नाही. शासनाच्या स्पष्ट आदेशांचे उल्लंघन करून ग्रामपंचायत प्रशासनाने शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या बाबतचे पुरावे म्हणून गुगल मॅपद्वारे काढलेली छायाचित्रे तक्रार अर्जासोबत जोडण्यात आली आहेत.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान,या संदर्भात ग्रामसेविका मीना उबाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही.
ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली तक्रार चुकीची आहे.
- उषा जगताप, सरपंच, कोळगाव डोळस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.