पुणे

आळंदीत ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियान

CD

आळंदी, ता. १३ : ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियानांतर्गत आळंदी नगरपरिषदेने विविध शाळांमध्ये तिरंगा राखी, तिरंगा रांगोळी स्पर्धा, माझे संविधान निबंध स्पर्धा, समूह गीत गायन स्पर्धा उपक्रम राबवीत नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केली. या चारही उपक्रमासाठी आळंदी (ता. खेड) शहरातून विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
गुरुवारी (ता. ७) आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक दोन शाळा क्रमांक चार या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच, तिरंगा राखी उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि बचत गट महिलांनी सहभाग घेतला. आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक ते तीनमध्ये शनिवारी (ता. ८) चित्रकला, तिरंगा राखी, तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये १७३३ विद्यार्थी, ३५ बचत गटाच्या महिला, ५५ शिक्षक आणि ३८ नागरिकांनी सहभाग घेतला. आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक चारमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवारी (ता. ११) हस्ताक्षर व माझे संविधान या विषयावर स्पर्धेचे आयोजन केले होते. या उपक्रमात १६८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक ते चारमध्ये मंगळवारी (ता. १२) समूहगीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमात १७०६ विद्यार्थी, ५० बचत गटाच्या महिला, ६० शिक्षक आणि ४५ नागरिकांनी सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने महिलांमध्ये खळबळ

तुझे न्यूड फोटो पाठवशील का? अक्षय कुमारच्या १२ वर्षाच्या मुलीला आला घाणेरडा मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

Cough Syrup Deaths : 'कफ सिरप'ने घेतला 12 बालकांचा जीव, पाच मुले गंभीर; औषधात आढळला विषारी घटक, नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्त्वाची चाचणी

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT