पुणे

हरिनामात दुमदुमली अवघी अलंकापुरी

CD

आळंदी, ता. १५ : दुथडी भरून वाहणारा इंद्रायणीचा तीर राज्यातून आलेल्या लाखो भाविकांनी फुलून गेला होता. राहुट्यांमधून चाललेला टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे.
संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत भरणाऱ्या कार्तिक वारीसाठी राज्यातीलच नव्हे तर तमिळनाडू, कर्नाटकामधून भाविक आळंदीत आले होते. परमोच्च भक्तीचा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी वैष्णवांचा मेळा आज इंद्रायणी तीरी पहाटेपासूनच जमला होता. इंद्रायणी नदीला चांगले पाणी होते. त्यामुळे भाविकांची स्नानाची सोय झाली. थंडीची तमा न बाळगता लाखो वैष्णवांनी इंद्रायणीवर तीर्थ स्नानासाठी गर्दी केली होती. इंद्रायणी स्नानाला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तीर्थस्थानानंतर देवस्थानच्या प्रशस्त दर्शन बारीतून भक्तीसोपान पूल आणि स्काय वॉकमार्गे दर्शनाची रांग मंदिरातून घेण्यात आली होती.
माउलींच्या समाधीवर पहाटेची पवमान पूजा झाल्यानंतर पहाटे पावणे तीन वाजता दर्शनाची रांग सुरू झाली. एकादशीमुळे भाविकांच्या महापूजा बंद होत्या. परिणामी असंख्य भाविकांना दर्शनाची सोय चांगली झाली. आज पहाटेपासूनच इंद्रायणी काठच्या दर्शन मंडपातील बारी पूर्ण भरून गेली होती. मंदिर परिसरात भाविक फुगड्या, फेर असे खेळ खेळत होते. शहरात ठिकठिकाणी कीर्तन, प्रवचन सुरू होते. अनेक धर्मशाळांमधून ज्ञानेश्‍वरी पारायण सुरू होते. वारकरी हरिनामात तल्लीन भक्तीची अनुभूती घेत होते. तीन दिवसांपासून वारीतील गर्दी कमी जाणवत होती. तुलनेत आज पहाटेपासून आणि दुपारनंतर वारकऱ्यांच्या गर्दीत वाढ होत गेली.

पोलिसांचे योग्य नियोजन
शहरात पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होती. प्रदक्षिणा मार्गावर दुकानांची गर्दी होणार नाही, याची काळजी नगरपरिषद आणि पोलिसांनी घेतली होती. महाद्वारातही पोलिसांनी बॅरिकेडिंग नियोजनबद्ध केले होते.

ट्रॅक्टर रथांचे प्रमाण कमी
नगर प्रदक्षिणेसाठी दोन वर्षांपासून ट्रॅक्टरला जोडून रथ तयार करण्याचे प्रकार वाढले होते. यापूर्वी नगरप्रदक्षिणेला रथाचा सहभाग कमी केल्याचे दिसून आले. त्यामुळे अवास्तव गर्दी होण्याचे प्रकार कमी झाले. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकापेक्षा मुखानेच भजन करीत वारकरी नगर प्रदक्षिणा करीत होते. प्रदक्षिणा मार्गावर कोकणी आणि कोळी भाविकांच्या दिंड्या लक्षवेधी होत्या.

मराठवाडा, विदर्भातील भाविकांची संख्या कमी
वारी म्हटले की मराठवाडा, खानदेश, विदर्भ या भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय दिसून येते. मात्र, यंदा ओला दुष्काळ आणि रब्बी हंगामाच्या पेरण्या रखडल्याने त्या भागातील भाविकांची संख्या तुरळक होती. कोकण, रायगड, ठाणे, नवी मुंबई भागातून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK Captain: संजू सॅमसनला संघात घेतलं, पण IPL 2026 मध्ये कर्णधार कोण? चेन्नईने स्पष्टच सांगून टाकलं

MP Murlidhar Mohol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा राज्यातील महायुतीवर परिणाम होणार नाही

Bihar Election Result 2025: एनडीएच्या प्रचंड विजयावर उत्तराखंडचे सीएम पुष्कर सिंह धामी म्हणाले, 'मोदीमय झाले बिहार!'

पाकिस्तानात गेलेल्या भाविकांच्या तुकडीतून महिला बेपत्ता; थेट धर्मांतर करुन लग्न केल्याचा दावा

Nivrutti Maharaj Indurikar Statement Video : इंदुरीकर महाराजांचं भर किर्तनातच टीकाकारांना चॅलेंज म्हणाले, ‘मुलीचं लग्न याहीपेक्षा टोलेजंग करणार, बघू..’’

SCROLL FOR NEXT