पारगाव, ता. २१ : आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात सततच्या पावसामुळे पेरलेली शेती तर संकटात आहेत. परंतु बटाटा लागवड करण्यासाठी आणलेले बियाणे घरातच पडून आहे. शिरदाळेतील काही शेतकऱ्यांनी तर बटाटा बियाणे चिरून ठेवले आहे. अतिवृष्टीमुळे लागवड करता येत नाही. यामुळे तयार केलेले बियाणे घरात सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
जून महिला अर्ध्याच्या वर संपला तरी पाऊस उघडीप घेत नसल्याने मोठे संकट शेतकऱ्यावर ओढवण्याची शक्यता आहे. शिरदाळे परिसरात काही वर्षांपूर्वी बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. गेल्या काही वर्षात बटाटा लागवड कमी झाली आहे. यंदा देखील ही लागवड घटणार होती परंतु अनेक शेतकऱ्यांनी बटाटा बियाणे आणून घरात ठेवले आहे. आठवड्यापासून बियाणे घरात पडून आहे. तर काही शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे. परंतु सततच्या पावसाने कसलीच शास्वती नसल्याचे शिरदाळे येथील बटाटा उत्पादक शेतकरी बाबाजी चौधरी, संदीप मिंडे, राघू रणपिसे, बाळासाहेब तांबे, सुरेश तांबे, केरभाऊ तांबे, कांताराम तांबे या शेतकऱ्यांनी सांगितले. तर पेरणी केलेली सोयाबीन, वाटाणा, मूग, उडीद, मका या पिकांची देखील अवस्था बिकट असून कदाचित दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते, असे शिरदाळे उपसरपंच बिपिन चौधरी, मयूर सरडे, गणेश तांबे यांनी सांगितले.
सडलेल्या पिकांचे पंचनामे करा
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतातील सडलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, शिरदाळेचे माजी उपसरपंच मयूर सरडे ,पहाडदरा सरपंच मच्छिंद्र वाघ, धामणी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांनी केली आहे.
05748
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.