पुणे

बाजारभावाअभावी फूल उत्पादकांत नाराजी

CD

आपटाळे, ता. २० : ऐन दिवाळीच्या सणासुदीला फुलांचे बाजारभाव समाधानकारक नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. फुलांची विक्री केल्यानंतर भांडवली खर्च वजा जाता हातात काहीच शिल्लक राहणार नसल्याने उत्पादकांची दिवाळी कशी निराशा जनक जात आहे.
जुन्नर तालुक्यातील कुसूर, वडज, निमदरी, सावरगाव या परिसरात मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन घेतले जाते. झेंडू, शेवंती या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने शेतकऱ्यांकडून या फुलांचे उत्पादन घेतले जाते. येथील फुले मुंबई येथील दादरसह अन्य फूल बाजारात विक्रीसाठी पाठवले जातात. सध्या शेवंती फुलाला प्रतिकिलोस चाळीस ते शंभर रुपये तर झेंडू फुलाला चाळीस ते ऐंशी रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याचे शेतकरी महेंद्र भगत यांनी सांगितले.
शेवंती फुलांसाठी एकरी भांडवली खर्च दीड लाखाहून अधिक खर्च येतो तर झेंडूसाठी सत्तर हजारपर्यंत भांडवली खर्च येत आहे. शेवंतीची फुले चार महिन्यानंतर तर झेंडू दोन महिन्यानंतर काढणीस येतो. सध्याच्या बाजारभावामुळे भांडवली खर्च देखील सुटणार नसल्याने फूल उत्पादक शेतकरी ऐन दिवाळीत आर्थिक संकटात सापडला आहे.


02803

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Air Pollution : पुण्यात यंदा दिवाळीला मागील वर्षी पेक्षा प्रदूषण कमी, हवेची गुणवत्ता सुधारली; नागरिकांना काही प्रमाणात दिलासा

India vs Australia 2nd ODI : रोहित शर्माला शेवटची संधी? गौतम गंभीरचा प्लॅन बी तयार; युवा खेळाडूकडून करून घेतला कसून सराव...

Kolhapur Accident : ‘मामा... असं कसं झालं हो..!, कोणावरही वेळ येऊ नये अशी कांबळे कुटुंबावर आली; भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा...

Bhaubeej 2025 Marathi Wishes: भाऊबीजनिमित्त लाडक्या भावा-बहिणीला पाठवा मराठीतून हटके शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक सुंदर संदेश

CM Yogi Adityanath : 'राजकीय इस्लाम'मुळे सनातन धर्माचे सर्वात मोठे नुकसान; शिवरायांचा उल्लेख करत CM योगी म्हणाले, 'आपल्या पूर्वजांनी...'

SCROLL FOR NEXT