पुणे

बदलत्या ऊर्सची नवी ओळख

CD

बदलत्या ऊर्सेची नवी ओळख

जवळच असलेला पुणे-मुंबई महामार्ग, अवघ्या चाळीस किलोमीटरवर पुणे शहर, हवेली-मुळशी या दोन तालुक्यांजवळ असलेल्या ऊर्से गावात आता नवनवीन गृहप्रकल्प उभे राहत आहेत. या गावाची शहरीकरणाकडे वेगाने वाटचाल होत आहे. ऊर्सेचे ऐतिहासिक महत्त्वदेखील मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथील दोन मावळ्यांनी दिलेले योगदान शौर्याची परंपरा. आज हे गाव दळणवळणाच्या महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक आहे. येथील ऐतिहासिक तळे शिवकालीन असून, त्याचा कायापालट सुरू आहे. मंदिरासमोर वसलेले हे तळे पंचक्रोशीतीलच नव्हे; तर तालुक्यातील एकमेव असे तळे मानले जाते.
- संतोष थिटे, ऊर्से
------------

पवन मावळातील अत्यंत महत्त्वाच्या गावांमध्ये ऊर्से गावाची गणना केली जाते. गेल्या पंचवीस वर्षांत गावाचा झालेला विकास लक्षणीय आहे. ऊर्सेचे ग्रामदैवत श्री पद्मावती देवी असून, गावातील मध्यवर्ती भव्य मंदिरात तीन गाभारे आहेत. यामध्ये मधोमध श्री पद्मावती, जोगेश्वरी आणि भैरवनाथ यांच्या मूर्ती असून उजवीकडे राम, लक्ष्मण आणि सीतामाता तर डावीकडे विठ्ठल-रखुमाई यांच्या सुंदर मूर्ती आहेत. मंदिरासमोर असलेले शिवकालीन तळे हे गावचे मुख्य आकर्षण आहे. मंदिरासमोर भव्य तळे असलेले हे तालुक्यातील एकमेव ठिकाण मानले जाते. दरवर्षी नवरात्रोत्सव, काकड आरती आणि इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात येथे आयोजित केले जातात.

गावातील विकास
ऊर्से येथे अकरा सदस्यांची ग्रामपंचायत असून, तिचे उत्पन्न कोटीच्या पुढे आहे. ऊर्से ही तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे. येथील निवडणुका पक्षविरहित पद्धतीने आणि विकासाला प्राधान्य देऊन पार पडतात. गावातील ज्येष्ठ मंडळींसोबत नव्या पिढीतील तरुणही या गाव विकासात सक्रिय सहभाग घेत असल्याने निर्णयप्रक्रिया आणि विकासकामांत उत्तम समन्वय राखला जातो. गावाचा विस्तार मोठा असल्याने पाणी, वीज, रस्ते, शाळा आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते. ऊर्सेची लोकसंख्या सुमारे पाच हजार असली, तरी औद्योगिकीकरणामुळे अन्य राज्यांतील सुमारे पंधरा हजार नागरिक येथे वास्तव्यास आहेत. नवी बांधकामे आणि विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या कामांमुळे गाव वेगाने विकसित होत आहे.

औद्योगिकीकरणामुळे प्रभाव
गेल्या पंचवीस वर्षांत ऊर्से परिसरात मोठे औद्योगिकीकरण झाले आहे. या माध्यमातून गावाच्या विकासात मोठे योगदान मिळाले आहे, असे मानले जाते. कंपन्यांनी अत्याधुनिक सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा योजनेसाठी मदत, वृक्षारोपण यासारख्या अनेक उपक्रमांतून गावविकासाला हातभार लावला आहे. आज गावातील बहुतांश तरुण विविध कंपन्यांत कायमस्वरुपी नोकरीवर आहेत. तसेच हजारो तरुणांना येथे रोजगार उपलब्ध झाला आहे. कंपन्यांकडून मिळणारा कर आणि स्थानिक घरमालकांना मिळणारे भाडे या दोन माध्यमांतून गावाला मोठी आर्थिक मदत मिळते. महिंद्रा सीआय, फिनोलेक्स केबल्स आणि जयहिंद यासारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्या येथे कार्यरत आहेत. या कंपन्यांशी संलग्न अनेक छोटे व्यावसायिकही गावातील अर्थचक्रात स्थिरपणे उभे आहेत.

नव्याने उभे राहणारे गृहप्रकल्प
गेल्या पंधरा वर्षांत गावातील जमिनींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महामार्गालगत असल्यामुळे ऊर्से गावाचा विकास झपाट्याने झाला आहे. शहरीकरणामुळे स्थानिकांसह बाहेरगावाहून आलेले नोकरदार, व्यापारी आणि कामगार यांनी जागा किंवा घरे खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. प्लॉटिंगच्या माध्यमातून अनेक बांधकामे सुरू आहेत. पाच ते दहा लाख रुपये प्रति गुंठा भावाने जमीन मिळत असल्याने अनेक शेतकरी नव्या आर्थिक प्रगतीकडे पाऊल टाकताना दिसत आहेत. द्रुतगती महामार्गालगत अडीचशे एकरांवर उभा राहत असलेला एक मोठा गृहप्रकल्प गावाला शहराच्या स्वरुपाकडे नेऊ लागला आहे. या गृहप्रकल्पामुळे जमिनींचे भाव आणखी वाढले आहेत. यातून अनेकांना उद्योगाच्या संधी, तर युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

शेती क्षेत्र
गावाचा प्रवास जरी शहरीकरणाकडे होत असल, तरी गावातील शेतीही सक्षमपणे उभी आहे. गावातील अनेक शेतकरी शेतीचे विविध प्रयोग करत असून, बागायती क्षेत्रात अनेक जण यशस्वी ठरत आहेत. यापूर्वी गावातील दोन शेतकऱ्यांना ‘कृषी गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दुग्ध व्यवसायातही गाव पुढे असून, जवळपास अकराशे हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यातही ऊर्से अग्रेसर आहे. गावातील आठवडे बाजार हा पंचक्रोशीतील सर्वांत मोठा असून, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ मिळते. यासोबतच जनावरांचा बाजार सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना जनावरे खरेदीसाठी परराज्यांत जाण्याची गरज राहणार नाही.

नियोजनबद्ध विकासाकडे वाटचाल
ऊर्से गावासह परिसरातील गावांचा विकास झपाट्याने होत असून, पुढील काळात हा विकास आणखी नियोजनबद्ध होण्याची अपेक्षा आहे. शहरातील गर्दीपासून दूर, पण शहराशी सतत जोडलेले असे ऊर्से गाव नागरिकांना कमी खर्चात शहरी सुविधा, स्वच्छ वातावरण आणि सुरक्षित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असल्याने गृहप्रकल्पांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. बंगल्यांसाठी दोन ते तीन गुंठ्यांचे प्लॉटिंग मोठ्या प्रमाणात होत असून, यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलत आहे. नियोजनपूर्वक विकासामुळे ऊर्से गावात व्यवसाय, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून, युवकांसाठी हा परिसर भविष्यातील प्रगत केंद्र बनण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology : डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये असतात 3 सर्वोत्तम गुण; पण एका कमतरतेमुळे आयुष्यभर जवळच्या लोकांना ठेवतात दुःखी

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

Numerology Prediction : समाज अन् कुटुंबात खूप नाव कमवतात 'या' मूलांकाचे लोक; मिळवतात भरपूर पैसा-यश-आदर, पहा तुमचा मूलांक

BJP MLA Sanjay Upadhyay Threat : बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांना पत्राद्वारे मिळाली जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

SCROLL FOR NEXT