पुणे

उशीरा भात काढणीचा रब्बी हंगामावर परिणाम

CD

भुकूम, ता. १९ ः मुळशी तालुक्यात पाऊस लांबल्यामुळे भात काढणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या उशीरा होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामाचे वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
तालुक्यात दरवर्षी रब्बी हंगामातील पेरण्या एक महिन्यापूर्वी पूर्ण होत असतात. त्यामध्ये काठाणाची पिके हरभरा, मसूर, वाटाणा, वाल आदी पिकांचा समावेश असतो. तसेच, आक्टोबरपासून जूनपर्यंत बागायती पिके घेतली जातात. टोमॅटो, बटाटा, कांदा व भाजी पाल्याच्या रोपांची लागवड होत असते. आतापर्यंत रोपे उगवून व लावून थंडीच्या मोसमात चांगली वाढत असतात. दरम्यान, थंडी चांगली पडू लागली तरी पेरण्या अद्याप सुरू नाही, अशी परिस्थिती आहे.
यावर्षी पाऊस मे महिन्यात सुरू झाला, तो ऑक्टोबर अखेरपर्यंत उघडलाच नाही. भात पेरण्या उशीरा झाल्यामुळे लागवडी उशीरा झाल्या. पाऊस लांबल्यामुळे काढणी उशीरा सुरू झाली. भात काढणी होत असलेल्या खाचरांमध्ये अद्याप मोठी ओल आहे. त्यामुळे पेरण्या करण्यास उशीरा होणार होत आहे. त्यामुळे भाताप्रमाणे रब्बी हंगामाचे उत्पादन मिळण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


02806

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update : कुर्ल्यात इमारतीच्या पाचव्या माळ्याला आग

Kolhapur News: ‘डीपी प्लॅन’, रिंगरोडला मिळेना मुहूर्त; गुंठेवारी नियमिती करणाचे घोंगडे अजूनही भिजतच

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

SCROLL FOR NEXT