भोर, ता. २७ : भोर तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या वन, कृषी तसेच पशुवैद्यकीय विभागांसह पाणीपुरवठा व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही एकमेकांसमवेत समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी (ता.२३) आयोजित केलेल्या नागरिक संवाद बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस वन विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी शीतल राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, पशुवैद्यकीय विभागाच्या वर्षाराणी जाधव, बांधकाम विभागाचे उपअभियंता विकास कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाच्या मनिषा भामरे, वीज महावितरणचे उपअभियंता अविनाश वाघमारे आणि पद्मावर चांडके आदी अधिकारी यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीच्या नियमांची माहिती दिली. या बैठकीस रणजित शिवतरे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, प्रवीण जगदाळे, मनोज खोपडे, संदीप खाटपे, संजय राऊत, सचिन पाटणे, केतन चव्हाण व जितेंद्र खोपडे आदींसह ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जंगली प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाची किंवा शेतपिकांची हानी झाल्यास त्यांनी वन विभागाच्या १९२६ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधून कल्पना द्यावी. त्यामुळे कृषी आणि पशुवैद्यकीय विभागाच्या समन्वयाने नुससानभरपाईची कार्यवाही करणे सोपे जाणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.