पुणे

बारामतीत कोंडीने नागरिक हैराण

CD

बारामती, ता. १९ : शहरातील दैनंदिन वाहतूक कोंडीने बारामतीकर हैराण झाले असून, याबाबत प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी बारामतीकरांची मागणी आहे.
अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने चारचाकी व दुचाकींचे केले जाणारे पार्किंग, अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण, रस्त्यांची काही ठिकाणी झालेली दुरवस्था, वाहतूक नियंत्रक दिव्यांचा अभाव, वाहनतळासाठी नसलेली जागा यांचा एकत्रित परिणाम म्हणून वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
वाहतूक पोलिस काही चौकात काही वेळा हजर असतात, तर काही वेळा काही कारणांनी ते हजर नसतात. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आता बारामतीत फक्त वाहतूक पोलिसांची नाही, तर वाहतूक नियंत्रक दिव्यांची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक नियंत्रक दिवे लावण्याबाबत सूचनाही दिलेल्या होत्या, मात्र अधिकाऱ्यांनी पुढे नेमके काय केले? याची माहिती गुलदस्त्यातच आहे.
कारवाई व दंडात्मक कारवाईचा बडगा उगारूनही नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील वर्दळीच्या चौकांमध्ये वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याची गरज आहे, मागणी नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shegaon Alert : दिल्ली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शेगावच्या श्री संस्थानमध्ये सुरक्षा वाढवली!

Navi Mumbai News: नवी मुंबईत वाहतुकीत बदल! 'या' भागात नो पार्किंग; नवे नियम लागू

Delhi Red Fort Blast: विमा पॉलिसीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा समावेश असतो का?

Mumbai Local: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर धावणाऱ्या १५ डब्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार! नवीन वेळापत्रक कधी जाहीर होणार?

Maldives Airport: विमानतळ ठरेल समृद्धीचे प्रवेशद्वार; मोईझ्झू, भारताच्या सहकार्याने प्रकल्प पूर्ण

SCROLL FOR NEXT