चाकण, ता.१० : बदलते कांदा निर्यात धोरण, निर्यातीबाबत वेगवेगळे नियम यामुळे कांद्याच्या निर्यातीत निम्म्याने घट झाली असे निर्यातदार, व्यापारी यांचे म्हणणे आहे. याचा फटका देशांतर्गत कांदा विक्री वाढली आहे; परंतु देशांतर्गत कांद्याचे भाव वाढत नाहीत. कांद्याचे भाव अगदी प्रति किलोला दहा रुपये ते कमाल पंधरा रुपयापर्यंत आलेले आहेत .कांद्याची घसरण ही प्रति किलोला दहा रुपयांनी झालेली आहे. ही घसरण मोठी आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो त्याबरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात या राज्यातही कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी देशातून १२ लाख टन कांदा निर्यात करण्यात आला आहे. कांद्याची निर्यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत निम्म्याने घटली आहे. कांद्याची निर्यात प्रामुख्याने आखाती प्रदेश, बांगलादेश, दुबई, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशात होते; परंतु ही निर्यात निम्म्याने घटली आहे, असे निर्यातदार व्यापारी प्रशांत गोरे पाटील, जमीरभाई काझी यांनी सांगितले.
चौकट : आंतरराष्ट्रीय बाजारात इतर देशांची कांदा निर्यात वाढली
केंद्र सरकारचे कांदा निर्यात धोरण हे लवचिक असते त्यामुळे त्याचा फटका निर्यातदार, व्यापारी, कंपन्या यांना बसतो. सध्या बांगलादेश, श्रीलंका आखाती प्रदेशात होत असलेली कांदा निर्यात निम्म्याने घटली आहे. केंद्र व राज्य सरकारने निर्यात वाढीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कांदा निर्यातीकडे लक्ष दिले तर कांद्याची निर्यात वाढेल. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तान व चीनच्या कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होत आहे, असे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व्यापारी माणिक गोरे, महेंद्र गोरे, कुमार गोरे, राम गोरे, विक्रम शिंदे, बाळू गायकवाड यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.