चाकण, ता.२८ : खेड तालुक्यातील चाकण व परिसरातील गावांत शनिवारी (ता. २७) रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी (ता. २८) सकाळी अकराच्या सुमारास थांबला. सकाळी सहापर्यंत ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती चाकणचे मंडलाधिकारी चेतनकुमार चासकर यांनी दिली. पावसाने थोडी उघडीप दिली तरी हवेत आद्रता होती तसेच ढगाळ वातावरण आहे. या पावसाने काही सोयाबीन व बागायती पिकांना फळभाज्या व पालेभाज्या पिकांना धोका पोहोचला आहे. काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जे बटाटा पीक काढणीस आलेले आहे त्या बटाटा पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे पावसाने उघडीप दिली तरच बटाटा पिकाची काढणी होईल. पाऊस अधिक काळ राहिला तर बटाटे सडतील असे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी विभागाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे पंचनामे करावेत, अशी मागणी महेंद्र मेदनकर, बाळासाहेब कड यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.