पुणे

भातपिके ओंब्यांनी लगडण्यास सुरुवात

CD

चास, ता.२१ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातपिके आंब्यांनी लगडण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीनची पिके शेंगांनी बहरली असून, परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. पिकेही जोमदार असल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.
खेडच्या पश्चिम पट्यातील वाडा, वाळद, आव्हाट, खरोशी, डेहणे, भोरगिरी, चिखलगांव यांसह परिसरात खरीप हंगामात भात हेच मुख्य पीक असून चालू हंगामात चांगल्या झालेल्या पावसामुळे पिके जोमदार आहेत. काही भागात पिकावर खोडकिड, पाने गुंढाळणाऱ्या अळीबरोबरच तांबेरा व करपा रोगाचाही प्रादूर्भाव दिसून आला होता. त्यावर औषधांची फवारणी तसेच उपाययोजना केल्यावर पिकांची स्थिती सुधारण्यास मदत झाली होती. खरीप हंगामात दोन प्रकारच्या भाताची लागवड केली जाते. त्यामध्ये हळवा व गरवा त्यात हळवा भाताचे पीक लागवडीनंतर साधारण नव्वद ते शंभर दिवसात तयार होते. गरवा भाताचे पीक लागवडीनंतर १२० ते १२५ दिवसांत कापणीसाठी तयार होते.
काही दिवसांपासून पुन्हा पावसाने चांगली हजेरी लावल्याने पिके चांगली बहरली आहेत. सोयाबीन पीक शेंगांनी लगडले आहे. भुईमुगाची पिके आऱ्या लागण्याच्या अवस्थेत असल्याने या पिकालाही पावसाची गरज असतानाचा पावसाने जोरदारपणे आगमन केल्याने पिकांच्या पोषणासाठी हा पाऊस उत्तम ठरला आहे. गेली दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून चांगले ऊन पडत असल्याने उन्हामुळे पिकांच्या पोषणाला अनुकूल वातावरण झाले असल्याने शेतांमधील अन्य कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ मिळाला आहे.

03848

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New York पोलिसांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा ताफा थांबवला; Donald Trump यांना फोन केला अन्..., काय घडलं? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: भाजप आणि काँग्रेस आक्रमक, एकमेकांविरोधात गुन्हा दाखल; साडी प्रकरणाने राजकीय वातावरण तापले

Sharad Pawar : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभा करा; बळीराजा वाचला नाही, तर राज्यावर मोठे संकट येईल

Latest Marathi News Live Update : खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर

Nitin Gadkari: शिक्षण देणे काळाची गरज, विद्यापीठांनी ज्ञानावर अधिक भर द्यावा, नितीन गडकरींचे आवाहन

SCROLL FOR NEXT