चास, ता. २३ ः चिखलगाव (ता. खेड) येथील आरळा नदीपुलावर असलेल्या पुलाला पडलेले जीवघेणे खड्डे वाहतुकदारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या पुलावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांनी केली आहे.
चिखलगावामधील आरळा नदीवर सुमारे २५ वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी पूल बांधलेला आहे. या पुलावरून नेहमीच वाहतूक सुरू असते. मात्र, या पुलाच्या दोन्ही बाजूंनी प्रवेश करताना पुलाच्या लगतच मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यांमध्ये वाहने आदळणे, वाहनांचे नुकसान होणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत.
या बाबत चिखलगावचे माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे यांनी सांगितले की, संबंधित बांधकाम विभागास वारंवार मागणी करूनही खड्डे बुजविले जात नाहीत. पावसामुळे खड्यात पाणी साचून खड्याचा अंदाज न आल्याने आतापर्यंत अनेक वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे.’’
03871
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.