पुणे

जीएमआरटी नोकर भरती संशयास्पद

CD

खोडद, ता. २ : जीएमआरटी आणि एनसीआरएची झालेली नोकर भरती प्रक्रिया संशयास्पद असून, ही प्रक्रिया शासकीय नियमानुसार न करता आर्थिक व्यवहार करून या नोकर भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड केली, असा आरोप करत या संपूर्ण भरती प्रक्रियेची चौकशी करावी, झालेली भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करावी व ही प्रक्रिया पुन्हा पारदर्शीपणे राबवावी, अशी मागणी खोडद (ता. जुन्नर) येथील ग्रामस्थांनी केली आहे.
जीएमआरटी आणि एनसीआरएमध्ये नुकतीच विविध ३८ पदांसाठी नोकर भरतीसाठी लेखी परीक्षा पार पडली, तर काही जागांसाठी उमेदवारांची निवडही केली आहे. गावातील स्थानिक उमेदवारांनी विविध पदांसाठी अर्ज केले होते. मात्र, परीक्षा केंद्रावर झालेल्या लेखी परीक्षेत अनेक संशयास्पद बाबी उमेदवारांना आढळून आल्या. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. १) सायंकाळी याबाबत निषेध नोंदविला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच मनिषा गुळवे, ग्रामपंचायत सदस्य, रवींद्र मुळे, योगेश शिंदे, नवनाथ पोखरकर, गणपत वाळुंज, सविता गायकवाड, जालिंदर डोंगरे, इंद्रभान गायकवाड, रवींद्र वामन, प्रा. राधाकृष्ण गायकवाड, संतोष काळे पोपट एरंडे, बाळासाहेब शिंदे, रोहिदास गायकवाड, रोहिदास पोखरकर, जितेंद्र पानमंद, चंद्रकांत पोखरकर, रवींद्र थोरात, शिवाजी खरमाळे, रोहिदास डोके, बबन एरंडे, बाळासाहेब कुचिक, चंद्रकांत पोखरकर, विजय गायकवाड, शंकर काळे, पोलिस पाटील सुहास थोरात, पंकज कुचिक आदी उपस्थित होते.
जून २०२४ मध्ये जीएमआरटीची नोकरीविषयी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या दरम्यान ग्रामस्थांनी स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केल्यानंतर जीएमआरटी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. स्थानिक तरुणांना या नोकर भरतीसाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल, असे आश्वासनही दिले होते. मात्र, जीएमआरटीने स्थानिक उमेदवारांना कोणतेही सहकार्य न केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, जीएमआरटी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या भरती प्रक्रियेबाबत ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे अद्याप काहीही लेखी स्वरूपात प्राप्त झाले नाही. ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे किंवा ज्या काही तक्रारी असतील त्या लेखी स्वरूपात मांडाव्यात, जेणेकरून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल.

सीसीटीव्ही अंतर्गत परीक्षा घेतल्या नाहीत
परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही अंतर्गत परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत. प्रश्न पत्रिका सील बंद नव्हती, जो उमेदवार परीक्षा केंद्रात परीक्षेसाठी उपस्थित नव्हता, जो उमेदवार पहिल्या १० मिनिटातच परीक्षा केंद्राबाहेर निघून गेला अशा उमेदवारांची निवड झाल्याने ही निवड प्रक्रिया पूर्वनियोजित आणि संशयास्पद असल्याचे मत प्रांजल गोसावी, शुभम कानडे, विकास खरमाळे, मानसी काळे या उमेदवारांनी व्यक्त केला.

प्रश्नपत्रिकांबाबत संशय
या भरती प्रक्रियेसाठी परीक्षेसाठी दिलेल्या अभ्यासक्रमाशिवाय ऐनवेळी बदल करून प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. निवड करण्यात आलेले उमेदवार हे सध्या नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आहेत, असे आरोप करून प्रश्न पत्रिका तज्ज्ञ व्यक्तीने काढली होती का? ती सुरक्षित ठेवली होती का? असे प्रश्न प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी यावेळी उपस्थित करून संशय व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT