कोळवण, ता. २८ : मुळशी तालुक्यात मे व जून महिन्यात झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे पिके तसेच जमिनीचे मोठे नुकसानीचे झाले होते. त्याचे पंचनामे पाच जुलै पूर्वी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.
नुकसानीबाबत ‘सकाळ’मधून तारीख २४ जून रोजी ‘भाताची पुनर्लागवड कशी करायची’ व २७ जून रोजी ‘भात उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडले’ अशी दोन वृत्त प्रसिद्ध झाली होती. त्याची तत्काळ दखल राज्याचे कृषी आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी घेतली व त्यांनी पाच जुलै पूर्वी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले. यावर तहसीलदार मुळशी, गटविकास अधिकारी मुळशी व तालुका कृषी अधिकारी मुळशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावातील नुकसानीचे पंचनामे हे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक संयुक्तरित्या करणार असून हे पंचनामे पूर्ण करून, अहवाल तहसीलदार यांना सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.
भोर राजगड मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी देखील कृषिमंत्री, कृषी आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पंचनामा करण्याचे पत्र दिले होते व कृषी आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. दरम्यान, शुक्रवार तारीख २७ रोजी तालुका कृषी अधिकारी यांनी कोळवण खोऱ्यातील नुकसानीची प्राथमिक पाहणी केली आहे.
पंचनामा करण्यासाठी शेतकरी द्यावयाची कागदपत्रे
१)सात बारा उतारा बाधित क्षेत्राचा
२)आठ अ उतारा
३) आधार कार्ड
४) बँक पासबुक झेरॉक्स
५)फार्मर आयडी
६) विहित नमुन्यातील अर्ज
02212
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.