पुणे

ओतूरला धुक्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त

CD

ओतूर, ता. १० : ओतूर (ता.जुन्नर) परिसरात सध्या दररोज पहाटे मोठ्या प्रमाणावर सर्वत्र धुके पसरत आहे. तसेच दुपारी कडक ऊन व ढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. रोगट हवामानामुळे उभी पिके या खराब होऊ लागली असून किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
ओतूरसह उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा, कोळवाडी, माळवाडी, बल्लाळवाडी, कोपरे, मांडवे, मुथाळणे, चिल्हेवाडी,पाचघर व परिसरातील इतर गावात पहाटेपासून मंगळवारी (ता.१०) मोठ्या प्रमाणात धुके पसरलेले होते.
धुक्यामुळे व खराब हवामानामुळे शेतामधील वटाणा, फरशी, सोयाबीन, कोबी, फ्लॉवर, काकडी, दौडके, टोमॅटो, वांगी, मेथी, पालक, कोथिंबीर, भेंडी, झेंडू, शेवंती ही व इतर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे.
या धुक्यामुळे आणि त्या नंतरच्या कडक उन्हामुळे शेतातील उभ्या पिकांवर अतिआर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. कीड, मर रोग आणि मव्याचा ही प्रादुर्भाव होणार आहे. तसेच भात पिकांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे. कीटकनाशक व बुरशीनाशक फवारणीचा प्रभाव ही धुक्यामुळे कमी होतो.तर फळ व फुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होतोच आणि फुलावर टीक पडून ते खराब होतात. एकूणच धुके व कडक उन्हामुळे शेतातील पिकांच्या उत्पादनात खर्चात वाढ होऊन ही उत्पादनात व गुणवत्तेत घट होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

00736

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT