परिंचे, ता.१७ : पारिंचे (ता.पुरंदर) नजिक राऊतवाडी येथील लघु पाटबंधारे तलाव वीरनाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची नावे मागील ३० वर्षांपासून सातबाऱ्यावर नोंदविण्यात आलेली नाही. या अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारपासून (ता. १५) तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. मात्र, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण ते स्थगित करण्यात आले.
शासनाने १९९६ मध्ये जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वीर येथे प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन करून शेतीची जमीन ताब्यात दिली. फेरफार क्रमांक १२९१ व २२९३ तयार असून, इतर प्रकल्पग्रस्तांची नावे सातबाऱ्यावर दाखल झाली असताना परिचे (राऊतवाडी) येथील शेतकऱ्यांची नावे अद्याप दाखल झालेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना पाणी योजना, बँकेचे कर्ज, शासकीय योजना यांचा लाभ मिळत नाही. तसेच मूळ मालकांकडून दादागिरी व त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
यावेळी उपोषणाला प्रकल्पग्रस्त शेतकरी महेश रामचंद्र राऊत, गणेश दशरथ राऊत, महेश गणपत राऊत, सुजित रामदास राऊत, प्रमोद केशव नवले, प्रवीण मल्हारी नवले, अमोल लक्ष्मण राऊत, रितेश रमेश राऊत बसले होते.
02729
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.