पुणे

‘सोमेश्‍वर’चे हार्वेस्टरद्वारे ऊसतोडीकडे जास्त लक्ष

CD

सोमेश्वरनगर, ता. ३ : ‘‘सोमेश्वर साखर कारखान्याकडे आताच्या हंगामासाठी साडेबारा लाख टन ऊस उपलब्ध असून, आणखी दीड लाख टन गेटकेन आणून चौदा लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, ऊसतोड मजुरांची टंचाई, वाहतूकदारांची फसवणूक या पार्श्वभूमीवर हार्वेस्टरद्वारे ऊसतोडीकडे जास्त लक्ष दिले आहे. चालू हंगामात चोवीस हार्वेस्टरशी (ऊसतोडणी यंत्र) करार केला आहे. आता तीस-पस्तीस टक्के ऊस हार्वेस्टरने तोडण्याचे उद्दिष्ट आहे,’’ असा विश्वास सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केला.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व रोहिणी जगताप, तसेच उपाध्यक्ष मिलिंद कांबळे व प्रतिक्षा कांबळे या दांपत्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, संचालक राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, विश्वास जगताप, बाळासाहेब कामथे, संग्राम सोरटे, सुनील भगत, अनंत तांबे, लक्ष्मण गोफणे, ऋषी गायकवाड, रणजित मोरे, जितेंद्र निगडे, हरिभाऊ भोंडवे, शैलेश रासकर, किसन तांबे, प्रणिता खोमणे, कमल पवार आदी उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ‘‘सन २०२५-२६ हंगामासाठी ३२ हजार एकर म्हणजेच साडेबारा लाख टन ऊस उपलब्ध आहे. परंतु, साडेनऊ हजार टन प्रतिदिन क्षमतेने किमान दीडशे दिवस गाळप करण्यासाठी चौदा लाख टन गाळप करणे क्रमप्राप्त आहे. म्हणून गेटकेन ऊस जवळच्या कार्यक्षेत्रातून आणावा लागणार आहे. ऊसतोड मजूर टंचाई असतानाही २४ ट्रक, ३०० ट्रॅक्टर, २२६० बैलगाडी, ६२० डंपिंग ट्रॅक्टर व २४ हार्वेस्टरशी करार पूर्ण झाले आहेत. कारखान्याचा लौकीक, देय रकमांची वेळेत पूर्तता, मजुरांसाठी सोयीसुविधा, मुलांसाठी कोपीवरची शाळा यामुळे ऊसतोड मजूर ‘सोमेश्वर’वर विश्वास ठेवून येतात आणि हंगामाच्या अखेरपर्यंत ऊस तोडतात. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले सचिव कालिदास निकम यांनी आभार मानले.

मागील काही हंगामात वाहतूकदारांना काही बोगस मुकादम, ऊसतोड मजूर यांनी कोट्यवधीचा गंडा घातला आहे. दुसरीकडे कारखाने वाढले आणि ऊसतोड मजूर घटलेत. त्यामुळे हार्वेस्टरकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. हार्वेस्टरने मुळापासून ऊस तुटल्याने उसाचे वजन वाढते आणि पाचट कुट्टी आपोआप होते. ऊस लागवड पाच फुटी पट्टा ठेवून केली तरच हार्वेस्टरने ऊस तोडता येतो. २०२६-२७ हंगामात किमान पन्नास टक्के ऊस हार्वेस्टरने तोडायचा आहे. त्यासाठी आताच शेतकऱ्याने तयारी करावी.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्‍वर साखर कारखाना

०४९६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Latest Marathi News Live Update: सिसारखेडा येथे गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

SCROLL FOR NEXT