पुणे

ग्राहक आयोगाचा परिवहन महामंडळाला दणका

CD

शिरूर, ता. १५ : शैक्षणिक कामासाठी एसटी बसचा मासिक पास काढूनही राज्य परिवहन महामंडळाकडून सदोष सेवा मिळाल्याने, तसेच अनेकदा पूर्वसूचना न देता बस रद्द झाल्याने मानसिक व शारिरिक त्रास होऊनही आणि त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्राहक आयोगात धाव घेतलेल्या विद्यार्थ्याला आयोगाने दिलासा दिला आहे. झालेल्या त्रासाबद्दल व गैरसोयीबद्दल याचिकाकर्ता विद्यार्थ्याला १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून एक हजार २० रुपये देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने एसटी महामंडळाला दिले आहेत.
सागर तानाजी रोकडे (रा. सविंदणे, ता. शिरूर) या विद्यार्थ्याने डिसेंबर २०२२मध्ये अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. टंकलेखन प्रशिक्षण वर्गासाठी दररोज शिरूर येथे यावे लागत असल्याने त्याने एसटी महामंडळाच्या शिरूर आगारातून जून २०२२मध्ये पाच हजार ४०० रुपये भरून सहा महिन्यांसाठी विद्यार्थी सवलत पास घेतले होते. शिरूर - सविंदणे या मार्गावरील शिरूर - लोणी व शिरूर - पहाडदरा या बसमधून प्रवास करीत असताना अनेकदा त्याला सदोष सेवा मिळाली. या मार्गावरील बस अनेकदा वेळेवर लागत नसल्याने त्यांना मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला. अनेकदा अस्वच्छ बसमधून प्रवास करावा लागला. अनेकदा पूर्वसूचना न देता या मार्गावरील बसेस रद्द केल्या जात असत किंवा प्रवासी नसल्याच्या कारणास्तव बस अपूर्ण मार्गातून मागे फिरविल्या जात. अशावेळी खासगी वाहनाने, कधी दुचाकीवरून तर कधी मिळेल त्या वाहनाने प्रवास करतानाही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
याबाबत रोकडे याने एसटी महामंडळाच्या शिरूर स्थानकावरील तक्रार पुस्तिकेत तक्रारी नोंदवून एसटी महामंडळालाही या त्रासाबाबत ई- मेलद्वारे कळविले होते. सदोष सेवेतील सुधारणांकडे लक्ष वेधण्यासाठी त्याने उपोषणाचा इशारा देखील दिला होता. मात्र, एसटीकडून या तक्रारींची दखल घेतली न गेल्याने, तसेच समस्यांमध्ये देखील सुधारणा न झाल्याने त्याने ग्राहक आयोगाकडे शिरूर आगार व्यवस्थापकांविरोधात तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली होती. एसटी महामंडळाकडून सवलत पासबाबतची वस्तुस्थिती मान्य केली. मात्र, सदोष सेवेचा मुद्दा नाकारत नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.
ग्राहक आयोगाचे अध्यक्ष अरुण गायकवाड, सदस्या प्रणाली सावंत व कांचन गंगाधरे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणातील लेखी जबाब, दाखल पुरावे, लेखी युक्तिवाद व दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ग्राहक आयोगाने रोकडे यांची तक्रार मान्य करीत नुकसान भरपाई म्हणून १५ हजार देण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले. ही रक्कम ४५ दिवसांच्या आत देण्याच्या सूचना आयोगाने दिली असून, या आदेशाची वेळेत अंमलबजावणी न झाल्यास निकालाच्या तारखेपासून रक्कम अदाकरेपर्यंतच्या काळात १२ टक्के दराने व्याज‌ द्यावे लागेल, असेही आदेशात म्हटले आहे.

शैक्षणिक कामासाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना एसटीच्या सेवेवरच अवलंबून राहावे लागते. त्यासाठी आगाऊ रक्कम भरून पास काढलेले असतानाही एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्यास पदरमोड करून, त्रास सहन करून प्रवास करावा लागतो. यातून वेळ व पैसा नाहक खर्च होतो. एसटी च्या सेवेत सुधारणा व्हावी, ग्रामीण जनतेला व विशेषतः विद्यार्थ्यांना चांगली प्रवासी सेवा मिळावी या उद्देशाने ग्राहक आयोगाकडे तक्रार केली होती. स्वतःच बाजू मांडत एसटीच्या सदोष सेवेचा मुद्दा प्रभावीपणे निदर्शनास आणून दिला. त्यातून न्याय मिळाला.
- सागर तानाजी रोकडे, तक्रारदार, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live: सत्ता कुणाची? महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज, राजकीय भवितव्य ठरणार

Indian Coast Guard Operation Video: तटरक्षक दलाची मोठी कारवाई! अरबी समुद्रामार्गे भारतात घुसखोरी करणाऱ्या नऊ पाकिस्तानीना पकडलं!

Indian Evacuation from Iran : इराणमधील संकटात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमाने सज्ज; परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT