पुणे

बाजारभावातून वाहतूक खर्चही भागेना

CD

टाकळी हाजी, ता. ११ : चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर वर्षभर कांदा चाळीत ठेवला. पण आता तो अर्ध्याहून अधिक सडून गेला आहे. तरीदेखील बाजारभाव अत्यंत कमी मिळत आहे. त्यातून वाहतूक खर्चही भागत नाही, अशी व्यथा आहे शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादकांची. कांदा सडू लागल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.

टाकळी हाजी (ता. शिरूर) बेट भाग परिसरात कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून कर्ज फेडणे, मुला-बाळांचे शिक्षण, आरोग्य आणि लग्न खर्च भागविण्याचे स्वप्न शेतकरी पाहतात. मात्र सध्या कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या सर्व आशा मावळल्या आहेत. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धरसोड पणाचा धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.

दरवर्षी १५ ऑगस्टनंतर कांद्याच्या नवीन लागवडीसाठी शेतकरी तयारीला लागतात. यंदा पावसाचा विलंब झाल्याने लागवड उशिरा झाली असली, तरी सध्या या कामाची लगबग सुरू आहे. मात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते. गेल्या वर्षी मार्चमध्ये काढलेला कांदा आजही अनेकांच्या चाळीत साठवलेला आहे. अतिवृष्टीमुळे कांदा सडून गेला असून, दुर्गंधी पसरत आहे. मजूर लावून चाळ स्वच्छ करावी लागते, महिलांना एका दिवसाची पाचशे रुपयांची मजुरी द्यावी लागते. एवढा खर्च करूनही कांद्याला फक्त १० ते १५ रुपये प्रतिकिलो बाजारभास मिळत आहे.

एकरी सव्वा लाख रुपये खर्च
कांदा लागवडीसाठी एका एकरासाठी मशागत, रोप तयार करणे, खुरपणी, खते, कीटकनाशके, वाहतूक आणि चाळीचा खर्च मिळून सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येतो. मात्र आता कांदा विकताना अर्धाही पैसा परत मिळत नाही. त्यामुळे शिक्षण, आरोग्य बँकांचे हप्ते आणि शेतीची पुढील तयारी यासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

शिरूर तालुक्यातील बेट भागात १०० ते २०० फूट लांबीच्या शेकडो कांदा चाळी आजही भरलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी ‘भाव वाढेल’ या आशेने कांदा साठवला, पण आता तो सडू लागल्याने निराशा पसरली आहे.

कांदा उत्पादकांना वाचवायचे असेल तर...
‘पावसानं झोडलं आणि सरकारनं मारलं तर दाद मागायची कुणाकडे?’ असा सवाल संतप्त कांदा उत्पादक शेतकरी विचारत आहेत. बँकांचे कर्ज वाढत आहे, मजुरीचे दर आभाळाला भिडले आहेत, आणि बाजारात कांद्याचे भाव कोसळले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून अनुदान, हमीभाव आणि चाळीतील नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

कांदा काढणी चालू असताना कांद्याला बारा ते चौदा रुपये किलोचा बाजारभाव होता. मात्र, यामधून चार पैसे अधिक मिळतील या आशेने आम्ही कांदा साठवून ठेवला मात्र आता अर्धा कांदा सडून गेला असून भांडवल ही शिल्लक राहत नाही.
- दत्ता पानगे, कांदा उत्पादक, निमगाव दुडे

कांद्याला उत्पादनासाठी एकरी सव्वा लाख रुपये पर्यंत खर्च येतो. मात्र, तो खर्च सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही. शासनाने कांद्याला ३० रुपये किलोप्रमाणे हमीभाव देण्याची गरज आहे.
- राजेंद्र गावडे, माजी संचालक बाजार समिती


00783

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: टीम इंडियाला धक्का! दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टार फलंदाज खेळणार नाही, कारण...

Pune Traffic: कार्तिक यात्रेनिमित्त पुण्यात उद्या वाहतूक व्यवस्थेत बदल; पालखीमार्ग टाळण्याचं आवाहन

Pimparkhed News : बिबट्यांच्या हल्ल्यानंतर पिंपरखेड ग्रामस्थांसाठी वनमंत्री गणेश नाईक उद्या भेटीस येणार !

Delhi Blast: आत्मघातकी हल्ला नाही! सुरक्षा यंत्रणांच्या दबावामुळे गडबडीत केला स्फोट; अपुऱ्या क्षमतेचा ब्लास्ट, सूत्रांची माहिती

Latest Marathi Breaking News : डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन, पोलिस अलर्टवर

SCROLL FOR NEXT