वेल्हे, ता.२६ : राजगड तालुक्यातील दुर्गम भोर्डी आणि वरोती येथे मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने केलेल्या पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास किल्ले राजगडाच्या पायथ्याशी १३ जुलैपासून शेतकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे.
बंधाऱ्यांच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत खूपसे यांनी मृद व जलसंधारणाचे मुख्य अभियंता कार्यालयास नुकतेच निवेदन दिले आहे.
दरम्यान, निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आमदार शंकर मांडेकर यांना सुद्धा देण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, भोर्डी येथील कामाचे अंदाजपत्रक हे चार कोटी ५४ लाख रुपये एवढे असताना या कामास नऊ वेळा वाढीवदायित्व निधी मंजूर करून त्या कामाची किंमत रक्कम रुपये ५५ कोटी ६० लाख एवढी करण्यात आली आहे. सदरचे काम चार वर्षांपूर्वी पूर्ण झाले असून मागील दोन वर्षात सहा वेळा काम न करता वाढीवदायित्व मंजूर करून ३५ ते ४० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. वरोती पाझर तलावासाठी १८ कोटी निधी मंजूर असताना ३३ कोटी म्हणजे ज्यादा बिल काढले हे फक्त एका वर्षाच्या कालावधीमध्येच म्हणजे १८ कोटीचा तलाव ५१ कोटी रुपयावर गेला तरीही काम पूर्ण झाले नाही. या तलावाचे काम करताना कोणतीही काळी माती वापरली गेली नाही मात्र काळी माती वाहतूक करण्यासाठी ७० ते ८० किलोमीटर अंतराची वाहतूक दाखवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.