वेल्हे, ता. २१ ः रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर व गुंजवणी पाणलोट क्षेत्राच्या बॅकवॉटर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे गुंजवणी धरण शनिवारी (ता. २०) १०० टक्के भरल्याची माहिती गुंजवणी धरण विभागाचे उपअभियंता नयन गिरमे यांनी दिली. धरणात क्षमतेइतका ३.६९ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरणाच्या वीज निर्मिती केंद्राच्या सांडव्यातून २५० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. मात्र शनिवारपासून धरण माथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला असला तरी निवी, कानंद, घेवंडे भट्टीसह घिसर परिसरातील ओढे- नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. रविवारी (ता. २१) धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.