वालचंदनगर, ता.१६ : जंक्शन (ता.इंदापूर) येथे शुक्रवारी (ता. १५) कामगारांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. शेती महामंडळात पूर्वी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी मोर्चानंतर उपोषणाला सुरुवात केली.
सरकारने राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करून शिल्लक राहिलेल्या जमिनी करार पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना दिल्या आहेत. महामंडळाची पीक पाणी योजना बंद झाल्यानंतर सात जिल्ह्यातील १४ मळ्यावर रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो कामगारांचे काम गेल्यामुळे बेरोजगार झाले आहेत. हाताला मिळेल ते काम करीत असून उपजीविका सुरू आहे. रोजंदारीवर काम करणारे हजारो कामगार शेती महामंडळाच्या पडक्या व धोकादायक चाळीमध्ये आजही राहतात. कामगारांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर समितीच्या शिफारशी लागू करून, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना दोन गुंठे जागा व राहते घर मिळावे, चौथ्या व पाचव्या वेतन आयोगातील फरक मिळावा.कामगारांची थकीत देणी देण्यात यावी यासाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी रत्नपुरी ते जंक्शन चौकापर्यंत लॉग मार्च काढला. यामध्ये शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते. मोर्चानंतर कामगारांचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे, सागर मिसाळ, आकाश पवार यांनी आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.
05362
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.